( BJYM Mumbai ) BJYM मुंबईचे अध्यक्ष श्री तजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली आज BJYM मुंबईच्या प्रतिनिधी मंडळाने DCP झोन ९ श्री निमित गोयल यांची भेट घेतली आणि Why Loiter Campaign विरोधात अधिकृत तक्रार दाखल केली.
Read More
( Priority providing houses to mill workers in Mumbai DCM shinde ) “गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घ्यावी. याशिवाय शेलू आणि वांगणी येथील घरांच्या किमती कशा कमी करता येतील, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांना दिले.
( eknath shinde on iconic building in Mumbai ) ब्रिटिशांच्या काळातील काही विशिष्ट इमारतींमुळे मुंबईची एक वेगळी ओळख आहे. जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात वैशिष्ट्यपूर्ण ‘आयकॉनिक इमारतीं’ना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने नवीन धोरण तयार केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली.
जुलैमध्ये मुंबईतील १२ हजार १३३ घरांची विक्री झाली असून त्यातून राज्य सरकारला १०४७ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्क वसुलीच्या रुपाने मिळाला आहे. जूनमध्ये ११ हजार ६४३ घरे विकली गेली होती. जुलैमध्ये यात काही वाढ झाली आहे. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये घर विक्री काहीशी वाढ झाली आहे. प्रामुख्याने पावसाळ्यात घरविक्रीत काहीशी घट दिसून येते. पावसाळा संपल्यानंतर घर विक्रीत वाढ होते.
भारतातील सार्वनजिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) बॅलार्ड पियरवर मुंबई इंटरनॅशनल क्रु झ टर्मिनलच्या अगदी समोर ‘मुंबई टुरिस्ट हेल्प डेस्क’ लाँच केले आहे. या डेस्कद्वारे मुंबईला भेट देणाऱ्या देशांतर्गत तसेच आंतर राष्ट्रीय पर्यटकांची मदत केली जाईल. मुंबईचा 'क्रुझ टुरिझम हब' म्हणून विकास करण्याच्या उद्देशाने मुंबई पोर्ट ट्रस्टने (MBPT) पोर्टवर नुकतेच ‘ मुंबई इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनल ’ बनवले आहे. सध्या दर आठवड्याला मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून तीन ते चार लक्झरी क्रुझ पर्यटकांना देशांतर्गत व
स्वच्छता ही एक मोहीम नसून लोकचळवळ असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते म्हणाले, स्वच्छता ही प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडीत असून यासाठी विद्यार्थी, प्रशासकीय यंत्रणा, सहकारी व सेवाभावी संस्था आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. तसेच, डीप क्लीन ड्राईव्ह या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होत आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी‘महाविजय-२०२४’अंतर्गत चार दिवसांच्या मुंबई लोकसभा मतदारसंघ प्रवासाला दोन जानेवारीला सुरुवात झाली. या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी ०४ जानेवारी २०२४ रोजी ते मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य मुंबई ) लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), मुंबई यांच्यातील सामंजस्य करारानुसार पशु उत्पादन व व्यवस्थापन विभाग आणि पशुधन प्रक्षेत्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने येथे दिनांक १२/१२/२०२३ ते २१/१२/२०२३ या दरम्यान १० दिवसीय निवासी शेळीपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
कामाठीपुराला मागास ठेवण्याचे पाप कुणाचे ?
महाराष्ट्र सरकारने मेट्रो ३ साठी मुंबईतील आरे मिल्क कॉलनीत कारशेड बांधण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. पर्यावरण वाद्यांच्या आदर आहे; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जर कोणी काम थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यामगे सदहेतू आहे का? असा प्रश्न निर्माण होतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई पोलिसांनी गेल्या ३ वर्षात ३,४१४ किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. यापैकी २०२१ मध्येच २५९३ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी आरटीआय अंतर्गत ही माहिती दिली आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत ८३.१३ कोटी रुपये आहे. मुंबई पोलिसांनी २०१९ मध्ये २५.२८ कोटी रुपये आणि २०२० मध्ये २२.२३ कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले. या अर्थाने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तिप्पट अधिक ड्रग्ज पकडण्यात आले आहेत.
दै. ‘मुंबई तरुण भारत’चे नवी दिल्ली प्रतिनिधी पार्थ कपोले यांनी सोमवार, दि. ५ एप्रिल रोजी केंद्रीय परिहवन मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पार्थ कपोले यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने रस्तेबांधणीविषयक वार्तांकन केलेले अंक भेट म्हणून दिले.
मुंबई उच्च न्यायालयाकडून आज वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक यांना मोठा दणका दिला आहे.
पत्रकार जे डे हत्याकांड प्रकरणावर आज मुंबईचे विशेष मकोका न्यायालय सुनावणी करणार आहे. या प्रकरणात कुख्यात गुंड छोटा राजन सहित ११ आरोपी ठरले आहेत.
भारतातील शेतकऱ्यांचे भवितव्य जपणारे हे सरकार आहे असे मत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय जनता पक्षाचा आजचा काळ हा काही सुवर्णकाळ नव्हे. पक्षाचा सुवर्णकाळ तेव्हाच असेल, जेव्हा ओडिशा, पश्चिम बंगाल, केरळसह केंद्रात भाजपची बहुमतात सत्ता येईल.