मुंबईचा समुद्रकिनारा हा प्रत्येक मुंबईकरासाठी आणि देशविदेशातून भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय. पण, प्लास्टिक कचरा व जलप्रदूषणामुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांची रयाच गेली आहे. अशा या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांना स्वच्छ करणाऱ्या काही हातांपैकी एक म्हणजे अॅड. अफरोज शाह. सनदशीर मार्गाने याविरोधात लढण्याऐवजी महात्मा गांधींच्या मार्गावर चालत त्यांनी ‘वर्सोवा बिच क्लिन अप’ ही समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम उभी केली आणि बघता बघता या मोहिमेला व्यापक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. या मोहिमेची दखल आंतरराष्ट्रीय स्
Read More
आपल्या कृषिप्रधान देशात शेतात राबणारे करोडो हात असले तरी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मदतीला धावून येणारे फारच कमी. पण, डहाणूच्या आशितकुमार सुमेरमल बोथरांसारखी काही व्यक्तिमत्त्वं याला अपवादही ठरतात. स्वत:ची शेती, नर्सरी, हॉर्टिकल्चर आणि लँडस्केपिंग व्यवसायाच्या व्यापातही ते डहाणूच्या शेतकऱ्यांच्या सर्वोपरी मदतीसाठी सदैव सज्ज असतात. म्हणूनच ते ठरतात डहाणूचे ‘ग्रीन मॅन’
फारसा प्रतिष्ठित नसणारा आणि कमी महत्त्व दिला जाणारा, परंतु, अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे ‘प्लम्बिंग. मात्र, आपल्या कार्याने सामाजिक बांधिलकीने तसेच विविध परिषदांच्या आयोजनातून या व्यवसायाला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यामध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करणारे ‘प्लम्बिंग कन्सलटंट मिलिंद शेटे यांची ही यशोगाथा.
गणपती... 64 कलांचा अधिपती. ज्ञानाची ही देवता... पालघरमधील ‘परफेक्ट ग्रॅफाईट अॅण्ड इलेक्ट्रिकल्स’ कंपनीचे उद्योजक ‘एस. गणपती’ हे त्यांच्या नावाला अगदी पुरून उरणारे. प्रचंड हुशारी, चिकित्सक व्यवहारी स्वभाव, तरीही संस्कृतीशी नाळ जोडलेला आणि वयाची साठी ओलांडलेला हा ऊर्जावान उद्योजक. सोने वितळविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रॅफाईटचे साचे-सामग्रीच्या निर्मितीचा त्यांचा व्यवसाय. तेव्हा, अशा या सर्जनशील आणि उद्यमशील ग्रॅफाईटच्या गणपतींचा हा जीवनप्रवास...
कला कोणतीही असो, त्याची साधना केल्यानंतरच सिद्धता प्राप्त होते. मोठमोठ्या कलाकारांनाही कलेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी, त्याच्याशी एकरूप होण्यासाठी अथक साधना करावी लागते. पण, जर एखादा लहान मुलगा ऐन खेळण्या-बागडण्याच्या वयात एखाद्या कलेत प्राविण्य संपादित करत असेल तर त्याला लाभलेली ही निसर्गाची देणगी आहे, असेच म्हणावे लागेल. तबल्यावर अगदी तन्मयतेने चालणाऱ्या तृप्तराज पंड्याची बोटे पाहिली कीयाची जाणीव होते.
आपल्या अंगभूत कलेला नाट्य, एकपात्री प्रयोग, काव्य आणि लेखनाद्वारे विविध रंगात भिनवणारे असेच एक नाट्यपंढरीतले हरहुन्नरी अभिनेते म्हणजे श्रीप्रकाश सप्रे.
आयुर्वेद हा संस्कृत शब्द. ‘आयु’ म्हणजे ‘जीवन’ आणि ‘वेद’ म्हणजे ‘विद्या’ असा केला जातो. वैद्यकीय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना परिस्थितीशी दोन हात करत कर्तृत्वाच्या जोरावर नवी मुंबईतील आयुर्वेद पंचकर्म उपचार पद्धतीमध्ये प्रसिद्ध असलेले डॉ. प्रशांत वाघमारे यांची ही यशोगाथा...
डोंबिवलीतील भारती मोरे समाजातील एकल महिलांसाठी काम करतात. मुंबईतील गिरणगावात त्यांचे बालपण गेले. चाळ संस्कृतीत लहानाच्या मोठे झालेल्या भारती मोरेंनी चाळीतील अडीअडचणीला धावून जायची पद्धत आपल्या वैयक्तिक आयुष्यातही अवलंबली.
‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या व्रताला सर्वस्व मानून समाजसेवेमध्ये सक्रिय असलेले वसईच्या आशीर्वाद नर्सिंग होमचे डॉ. जयश्री आणि रवींद्र देशपांडे हे डॉक्टर दाम्पत्य.
ध्यास आयुर्वेदाचा
रुईया महाविद्यालयातील विद्यार्थिनी. लहानपणापासून चित्रकलेची आवड. व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील बालपण. फॅशन डिझायनिंगचे शिक्षण आणि काहीतरी जगावेगळं करून दाखविण्याची मनात असलेली जिद्द या जोरावर महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक वर्तुळातील एक चेहरा असलेल्या आरती कांबळे यांनी आई, पत्नी, सून, मुलगी या भूमिकाही यशस्वीपणे निभावल्या आहेत. शून्यापासून सुरू केलेल्या या उद्योगिनीचा सहाशे कोटींपर्यंतचा हा प्रवास...
कौटुंबिक व्यावसायाची स्थिती नाजूक असतानाही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करत 'श्री साई इंडस्ट्रीज' या भागीदारीतील कंपनीचा विस्तार सातासमुद्रापार पोहोचवत तितकाच हातभार समाजकार्यातही लावणारे धनंजय लोहार यांचा अवघ्या साडेतीन रुपयांपासून व्यवसाय सुरू करणारी संघर्षमय कथा खरचं प्रेरणादायक आहे.
आजच्या जगात काहीच मोफत मिळत नाही. दहावी, बारावीच्या क्लाससाठीही लाखोंची फी उकळली जाते. त्यातच जर अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणाचे क्लासेस असतील, तर फी ऐकूनच धक्का बसतो. पण, असा एक अवलिया आहे, जो वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांना मोफत ज्ञानाचे भांडार खुले व्हावे, यासाठी धडपडत आहे. विद्यार्थीसेवेचे व्रत घेतलेले डॉ. विवेक नळगीरकर...
मुलांचे संगोपन उत्तमरित्या व्हावे, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. मात्र, आजघडीला घर सांभाळण्याबरोबरच त्या घराला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची जबाबदारीही महिलांनी स्वीकारली आहे. मुलं थोडी वयाने मोठी झाली की, नोकरदार महिलांना त्यांना पाळणाघरात ठेवून कामावर जावेच लागते. पाळणाघरापेक्षा दुसरे घरच म्हणता येईल, असे बदलापूरमधील टिळक काकूंचे सुरक्षित आणि संस्कारांची
सुट्टीचा सदुपयोग व्हावा म्हणून सहज व्यक्तिमत्त्व विकास आणि नाटक कार्यशाळेत योगेश सोमण यांनी सहभाग नोंदवला. यानंतर हा प्रथितयश रंगकर्मी आयुष्याच्या आणि करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी नाटककार म्हणून उदयास येत गेला. आज त्यांच्या रोखठोक भूमिका आणि करारीपणामुळे ते नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. अशा या प्रतिभावंत रंगकर्मी आणि एका मोठ्या मनाच्या दिलदार माणसाच्या कर्तृत्वाचा हा प्रवास...
मुंबईच्या शहरी आणि विक्रमगडच्या दुर्गम वनवासी भागामध्ये तळमळीने सकारात्मक बदल करणारे प्रा. हरेश शहा यांच्या कर्तृत्वाचा आवाका मोठाच म्हणावा लागेल. शिक्षणक्षेत्रामध्ये कार्यरत असताना हजारो युवा विद्यार्थ्यांना सक्रिय समाजशील बनवून त्यांना समाजकार्यात सहभागी करणारे प्रा. हरेश शहा...
कॉम्प्युटर वापरकर्त्यांसाठी आज ‘अॅन्टी व्हायरस’ हा परवलीचा शब्द. परंतु, ज्या काळात कॉम्प्युटरच काचेच्या खोलीत ठेवले जायचे, त्या काळात एका मराठमोळ्या माणसाने अॅन्टी व्हायरसचा शोध लावणे, आपल्या टूल्सचा प्रसार करणे आणि जिद्दीच्या, हिमतीच्या बळावर स्वतःची कंपनी स्थापन करणे, हा चमत्कारच म्हटला पाहिजे. पण, हे सत्यात उतरवून दाखवले कधीकाळी पुण्याच्या एका चाळीत राहणाऱ्या, रेडिओ रिपेरिंग करणाऱ्या अन् मंगळवार पेठेत कॉम्प्युटर रिपेरिंगचे दुकान असणाऱ्या कैलास काटकर यांनी. ‘क्विक हिल’ या भारतातील सर्वाधिक मोठ्या कॉम्प्यु
‘स्मार्ट’ आणि ‘डॅशिंग’ व्यक्तिमत्त्व असलेला मराठी चित्रपटसृष्टीचा नायक म्हणून ललित प्रभाकरकडे बघितले जाते. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून ललित घराघरात पोहोचला. ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटात गोपाळरावांची गंभीर भूमिकाही ललितने लीलया साकारली. अशा या हरहुन्नरी आणि एका सामान्य घरातून आलेल्या ललितने योग्य निर्णय आणि कठोर परिश्रमांनी यशोशिखर गाठले आहे. ललितच्या या लालित्यपूर्ण प्रवासाचा घेतलेला हा आढावा....
आपली कला सर्वस्वाने जगणारा तो कलासाधक. ‘सुगो’ जाहिरात एजन्सीचे सुभाष गोंधळे यांचेही आयुष्य असेच कलासंपन्न. ते उत्तम चित्रकार, सुलेखनकार तर आहेतच, पण जाहिरात या ६५व्या कलेतही त्यांनी स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले. अशा या वसईच्या कलासाधकाच्या विविधांगी भावनांच्या रंगांनी बहरलेल्या जीवनाचा हा जिवंत कॅनव्हास...
“तुमचे तुमच्या मुलाकडे लक्ष आहे का?,” असे सांगत ‘रेगे’ साकारणारा, पहाडाएवढे कर्तृत्व असलेल्या बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक भूमिगत कामे मार्गी लावणारा आणि ठाकरेंवरील चित्रपटाचे शिवधनुष्य पेलणारा असा हा ईश्वर न मानणार्या वडिलांचा प्रचंड सश्रद्ध बंडखोर मुलगा, झी टीव्हीवरील हल्ला, राज ठाकरेंना ‘रिप्लेस’ करणारा भारतीय विद्यार्थी सेनेचा प्रमुख ते आता ‘राज’ कारण करत असलेला मनसे नेता. सिद्धहस्त लेखक, दिग्दर्शक अभिजीत पानसे...
सामान्य कुटुंबात जन्माला येऊन आपल्या कर्तृत्वाने कुटुंबाची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचविणाऱ्या, जीवनातील संकटे ही संधी समजून त्या संकटांवर मात करत आपले कर्तृत्व सिद्ध करणारा, नौकेत बसून पाण्याला जसे झपाझप कापावे, तसे जीवनध्येय गाठताना वाटेतील अडचणी कापणारा आणि मनातील भीतीवर मात करण्यासाठी खास करून नौकानयन क्रीडा प्रकार निवडणारा भारताचा नौकानयन प्रकारातील एकमेव ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ याचा हा जीवनप्रवाह...
न्यायदेवतेची सेवा करणाऱ्या कुटुंबामध्ये जन्माला येऊन तोच वसा पुढे नेणारे, देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या अनेक संवेदनशील खटल्यांमध्ये सरकारी पक्षाची बाजू मांडत अनेकांना खडी फोडण्यास पाठविणारे नाशिकमधील असामान्य कर्तृत्व म्हणजे सरकारी वकील अजय मिसर. त्यांच्या कर्तृत्वामुळे गुन्हेशाबितीकरण दरात आजमितीस नाशिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्याच कार्यकर्तृत्वाचा परामर्श घेणारा हा लेखप्रपंच.
रेशनच्या दुकानात सांडलेल्या धान्यावर ज्याच्या जेवणाची थाळी सजायची, जन्मापूर्वीच ज्याने पितृछत्र हरपलेले पाहिले, अकरावीत दोनदा नापास झाल्यानंतर सावरलेला हा अवलिया तरुण पुढे मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे अढळ स्थान प्राप्त करतो. आयुष्यात ‘टर्निंग पॉईंट’ असतात, मात्र ते समजण्याची कुवत असावी लागते. एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी विजू माने यांची ही कर्तृत्वगाथा...