शिक्षणमंत्री उदय सामंत विद्यार्थ्यांच्या भावनांशी सुरू असलेला खेळ त्वरित थांबवा आणि विद्यार्थ्यांची जी मागणी आहे की परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने व्हाव्यात त्यावर सकारात्मक निर्णय करा.
Read More
सर्व परीक्षा ह्या ऑनलाईन स्वरूपात घेण्यात याव्या यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांची मागणी सुरु होती, पण ती मागणी आता पूर्ण होऊ शकणार नाही. कारण यापुढील सर्व प्रकारच्या परीक्षा या ऑफलाईन स्वरूपात होणार असल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयीन परीक्षांबाबत राज्य सरकार काय निर्णय घेईल याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. या परीक्षा ऑनलाईन स्वरूपात असतील की ऑफलाईन स्वरूपात याबाबतचा निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही. सोमवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील कार्तिक नावाच्या एका अंधविद्यार्थ्याने ऑफलाईन परीक्षेदरम्यान लागणाऱ्या मदतनीसाच्या मागणीसंदर्भात ठाकरे सरकारकडे विनंती केली आहे.
मुंबई विद्यापीठाने एप्रिल - मे दरम्यान होणाऱ्या बहुतेक परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर मुंबईतील बऱ्याच महाविद्यालयांनी त्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करून पुन्हा ऑफलाईन शिक्षण सुरु केले आहे. परंतु ऑनलाईन शिक्षण अचानक बंद करून ऑफलाईन शिक्षण सुरु करण्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
आपण १५-२० वर्षे वयाच्या तरुण मुला-मुलींच्या भविष्याशी खेळतो आहोत, हे कुणाच्याही लक्षात येत नाही. सवलती मागणारे विद्यार्थी, त्यांना चिथावणी देणारे पुढारी अन् घरात मूग गिळून बसलेले अस्वस्थ पालक यातून निर्माण होणारे भवितव्य, हे कोरोनापेक्षाही अधिक गंभीर असणार, हे अजूनही आपल्या लक्षात येत नाही.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे नागरिकांची झुंबड उडालेली आहे. जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे.