शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्यासमोर सुनावणी पार पडली. दरम्यान, न्यायालयाने अजित पवारांसह त्यांच्या ४१ आमदारांना नोटीस बजावली आहे. तसेच हे दोन्ही प्रकरण सारखे असल्याने यावर एकाचदिवशी पण स्वतंत्र सुनावणी होणार आहे.
Read More
माझं निर्णय घटनेला धरून आहे हे त्यांनाही माहिती आहे. पण माझा निर्णय चुकीचा आणि कुणाच्या प्रभावाखाली घेतलेला असेल तर त्यांनी दाखवून द्यावं, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही गट न्यायालयात गेले आहेत. यावर आता राहूल नार्वेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली.
राज्यात सध्या शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा चर्चेत आहे. १० जानेवारी रोजी कोणालाही अपात्र न करता खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी निकाल दिला होता. या निर्णयाविरोधात आता शिंदे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. उबाठा गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बुधवारी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागणार आहे. दरम्यान, त्याआधीच विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याने उद्धव ठाकरेंनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर आता राहूल नार्वेकरांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत ठाकरेंना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.
नागपुर येथे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पार पडली असून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणी दीपक केसरकर यांची उलटतपासणी सुरु आहे. यावेळी उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून आदरापोटी उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख असा उल्लेख होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एखाद्या कामानिमित्त आमदारांच्या घेतलेल्या सह्या मुद्दाम दुसऱ्या ठरावाला जोडण्याची बोगसगिरी उबाठा गटाने केली असल्याचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. शनिवारी शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी पार पडल्यानंतर शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी ३० ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी सादर केलेले वेळापत्रक फेटाळले आहे. तसेच आमदार अपात्रतेप्रकरणी ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता कार्यवाहीचे वेळापत्रक ३० ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना आमदार अपात्रता कार्यवाहीचे वेळापत्रक १७ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्याविषयी मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांनी सादर केलेल्या वेळापत्रक असमाधान व्यक्त केले.
नुकतीच राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवले आहे. आज संध्याकाळी ७ वाजता मंत्र्यांना वर्षा निवासस्थानी बोलवण्यात आले आहे. वर्षा बंगल्यावरील बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्र्यांना बोलवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानसभा अध्यक्षांवर कुणाचा दबाव आहे का? असा सवाल केला होता. आता भाजप खासदार प्रताप चिखलीकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवेंनी वायफळ बडबड करु नये, असे ते म्हणाले आहेत. नांदेड येथे बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सोमवारी सुनावणी पार पडली. दरम्यान, ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार आहे. सगळ्या प्रकरणावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केले आहे.
विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी आज पार पडली. यावेळी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. याप्रकरणी एकूण ३४ याचिका असून आजच्या सुनावणीनंतर या याचिकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.