मुंबईत पाणीटंचाई वाढणार! १० एप्रिलपासून पाणी टँकर बंद; काय आहे कारण?

    08-Apr-2025
Total Views | 16
 
Water Tanker
 
मुंबई : भर उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वॉटर टँकर असोसिएशनने १० एप्रिलपासून वॉटर टँकर सेवा बंद करण्याचा इशारा दिल्यामुळे मुंबईत पाण्याचे संकट येणार आहे.
 
नेमकं कारण काय?
 
मुंबई महापालिकेकडून विहीर आणि बोअरवेल मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये विहीर आणि बोअरवेल मालकांना एनओसी घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच एनओसी न घेतल्यास पाणीपुरवठा बंद होईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. दरम्यान, विहीर आणि बोअरवेल मालकांकडे एनओसी नसल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे १० एप्रिलपासून वॉटर टँकर असोसिएशनने संप करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
हे वाचलंत का? -  १० वर्षे स्वावलंबनाची, १० वर्षे आत्मनिर्भरतेची : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा ३३ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. त्यात आता मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील अनेक भागांतील लोकांना वॉटर टँकरवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे मुंबईकरांपुढे सध्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
 
मंत्री आशिष शेलार यांचे पत्र
 
मुंबईतील पाणी समस्या टाळण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. दरम्यान, आता मुंबईकरांची ही पाणी समस्या सोडवण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाला घेऊन झाला फरार

बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाला घेऊन झाला फरार

Uttar Pradesh उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एका हिंदू व्यक्तीने आपल्या हॉटेलवर बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाला घेऊन झाला फरार बनवणाऱ्या एका युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्या युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला घरी सोडले आणि त्यानंतर हॉटेल मालकाने युवकाला पकडले आणि यामुळे मोठे वादाला तोंड फुटले. यानंतर हॉटेल मालकाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून संबंधित व्यक्तीला चांगलाच चोप दिला होता. घायाळ झालेल्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तक्रारीच्य..

हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर ईडीची टांगती तलवार

हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर ईडीची टांगती तलवार

सक्तवसुली संचालनालयाने हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले. २७.५ कोटी किंमतीचे शेअर्स आणि दालमिया सिमेंट्स लिमिटेड यांच्या मालकीची ३७७.२ किंमतीची जमीन तात्पुरीची जप्त केली आहे. यावर डीसीबीएलने म्हटले की, जप्त करण्यात आलेली मालमत्ता ७९३.३ कोटी किंमतीची आहे. हा जप्तीचा खटला दाखल झाल्यानंतर १४ वर्षानंतर हा खटला सुरू करण्यात आला. सक्तवसुली संचालनालयाने जप्तीचा निर्णय केंद्रीय अन्वेशन ब्युरोने २०११ मध्ये भारती सिमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक करण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121