श्रीराम जन्मोत्सवात न्हाऊन निघाली अयोध्यानगरी

सूर्यतिलकाच्या नेत्रदीपक दृश्याने रामभक्त भारावले

    07-Apr-2025
Total Views | 3
 
 Ayodhya city occasion of Shri Ram birth anniversary
 
मुंबई: ( Ayodhya city  occasion of Shri Ram birth anniversary ) रामनवमीनिमित्त अयोध्येत उत्साहाचे वातावरण होते. श्रीराम जन्मोत्सवाच्या आनंदात संपूर्ण अयोध्यानगरी तल्लीन झाली होती. रविवार, दि. ८  एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रीरामललाच्या कपाळी लावण्यात आलेल्या सूर्यतिलकाचे दर्शन सार्‍या भाविकांनी घेतले. गेल्यावर्षीसुद्धा अशा प्रकारे सूयर्र्तिलक लावण्यात आला होता. श्रीराम नवमीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचले होते. राम मंदिरासह अयोध्येतील सर्व मंदिरे फुलांनी सजवण्यात आली होती.
 
‘रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, “सकाळी प्रभू श्रीरामाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी ९.३० ते १०.३०  या वेळेत प्रभूंचा शृंगार झाला. त्यानंतर नैवेद्य दाखवण्यात आला. दुपारी १२  वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आरती करण्यात आली. देवाला ५६ प्रकारचा भोगही दाखवण्यात आला होता. विशेष म्हणजे दहा विद्वान पंडित एक लाख श्रीराममंत्राचा जप यावेळी करताना दिसले.
 
मंदिर परिसरातील संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि पवित्र झाले होते. हा ऐतिहासिक क्षण प्रत्येक भाविकांपर्यंत पोहोचावा, यासाठी अयोध्येत ठिकठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. उन्हाळ्याची वेळ असल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. येणार्‍या भाविकांसाठी पाण्याच्या बाटल्यांचीही व्यवस्था केली. लोकांना उन्हात उभे राहावे लागू नये, यासाठी हनुमानगढीभोवती तात्पुरत्या तंबूची व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी कुलरही बसवण्यात आले होते.
 
अयोध्येत सातत्याने स्वच्छता व्यवस्था ठेवण्यात आल्याचे दिसून आले. सार्‍या भाविकांनी घेतले. गेल्यावर्षीसुद्धा अशा प्रकारे सूयर्र्तिलक लावण्यात आला होता. श्रीराम नवमीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचले होते. राम मंदिरासह अयोध्येतील सर्व मंदिरे फुलांनी सजवण्यात आली होती.
 
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रीराम नवमीच्या शुभेच्छा
 
श्रीराम नवमीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, “श्रीराम नवमीच्या पवित्र सणानिमित्त सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. हा सण धर्म, न्याय आणि कर्तव्याचा संदेश देतो. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांनी मानवजातीसाठी त्याग, वचनबद्धता, सौहार्द आणि शौर्याचे सर्वोच्च आदर्श मांडले आहेत. त्यांची रामराज्याची संकल्पना आदर्श मानली जाते. याप्रसंगी सर्व देशवासीयांनी विकसित भारताच्या निर्मितीसाठी एकत्रितपणे काम करण्याची प्रतिज्ञा घ्यावी, अशा शुभेच्छा देते,” असेही राष्ट्रपती म्हणाल्या.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुभेच्छा देताना म्हणाले की, “प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाचा हा पावन प्रसंग आपल्या सर्वांच्या जीवनात नवीन चेतना आणि उत्साह घेऊन येवो, जो सशक्त, समृद्ध आणि समर्थ भारताच्या संकल्पाला सातत्याने नवीन ऊर्जा प्रदान करो.” तसेच, “रामनवमीचा पवित्र सण तुम्हा सर्वांच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो,” अशा शुभेच्छा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्या.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

ममता बॅनर्जी अधुनिक जिना, भाजप नेते तरुण चुघ यांची ममता सरकारवर बोचरी टीका! पश्चिम बंगालमध्ये वक्फ विरोधात हिंसक परिस्थिती कायम

Mamata Banerjee "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आधुनिक जिना म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालतील मुस्लिम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात", अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी १३ एप्रिल रोजी रविवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे. वक्फ सुधारित विधेयकावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता सरकार सपशेल अयशस्वी ठरले आहे...

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील आरोपी विशाल गवळी याची तळोजा कारागृहात आत्महत्या

कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात ..

मध्य प्रदेशात हनुमान जयंती मिरवणुकीत जमावाकडून हिंदूंवर दगडफेक, नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

मध्य प्रदेशात हनुमान जयंती मिरवणुकीत जमावाकडून हिंदूंवर दगडफेक, नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

Hanuman Jayanti मध्यप्रदेशातील गुना शहरातील हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणात संबंधित पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. यावर अधिकाऱ्यांनी रविवारी १३ एप्रिल २०२५ रोजी माहिती दिली आहे. यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना कर्नलगंज येथे असलेल्या मशि‍दीच्या भोवताली घडली आहे. सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी दोन्ही गट एकमेकांसमोर आले. यावेळी अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ते घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121