बँकेच्या एटीएममध्ये १००-२०० रुपयांच्या नोटा मिळत नाहीत? आता चिंता मिटणार!

    29-Apr-2025
Total Views | 7
बँकेच्या एटीएममध्ये १००-२०० रुपयांच्या नोटा मिळत नाहीत? आता चिंता मिटणार!
 
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एटीएममधून मिळणाऱ्या नोटांच्या स्वरूपात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बऱ्याच वेळा ग्राहकांना एटीएममधून केवळ ५०० रुपयांच्या नोटाच मिळतात. ज्यामुळे दररोजचे व्यवहार करताना अडचणी येतात. ही गोष्ट लक्षात घेता आरबीआयने सर्व बँकांना एक सूचना दिली आहे.

रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या एका परिपत्रकानुसार, सर्व बँकांनी आपल्या एटीएममध्ये १०० रुपये आणि २०० रुपयांच्या नोटांचा पुरेसा साठा ठेवावा आणि ग्राहकांना या लहान किमतीच्या नोटा सहजपणे मिळतील, याची काळजी घ्यावी. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील दुकानदार, रिक्षाचालक, आणि इतर सामान्य व्यवहार करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय देशभरातील रोख व्यवहार अधिक सोपा व्हावा या दृष्टीने घेतला आहे. बँकांनी आपल्या एटीएम मशिन्सचा आढावा घेऊन, लवकरात लवकर ही सुधारणा लागू करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. नवीन परिपत्रकामुळे ग्राहकांना आता लहान किमतीच्या नोटांसाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज भासणार नाही आणि त्यांचा वेळ वाचेल. या निर्णयाचे स्वागत सामान्य नागरिकांपासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्व स्तरांवर होत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

पहलगाम हल्ल्या नंतर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना जबरदस्त उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण केले. दि. ७ मे रोजी रात्री १ वाजून ४ मिनिटांनी ते दीड वाजताच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले. भारतीय दलांनी पाकिस्तानमध्ये बहावलपूर आणि मुरीदके येथे हल्ले केले आणि जैश आणि लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. कित्येक वर्षांपासून या दोन्ही दहशतवादी संघटना सातत्याने भारताविरोधात कारवाया करत आहेत. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद प्रमूख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर जो जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल प्रमुख आणि आयसी-८१४ अपहरणाचा मास्टरमाइ..

ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी... लेखक विक्रम संपथ यांची

"ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी..." लेखक विक्रम संपथ यांची 'ती' पोस्ट व्हायरल!

दहशतवाद्यांच्या विरोधात भारताने सुरु केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाक पुरस्कृत दहशतवादाचा खात्मा करण्याचा चंग भारताने बांधला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवायचा निर्णय घेतला आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. इंग्रजी भाषेमध्ये सावरकरांचे द्विखंडात्मक चरित्र लिहीणारे तरुण लेखक विक्रम संपथ यांनी या पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी झालेल्या भेटीचा उल्लेख ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121