- सहा जिल्ह्यांमध्ये १२ महसूलवसुली अधिकार्यांची नियुक्ती
28-Apr-2025
Total Views |
मुंबई: ( Recovery of Rs 684.56 crore from MahaRERA ) ‘महारेरा’च्या आदेशानुसार जिल्हाधिकार्यांना तक्रारदाराला व्याजाची तसेच घराची रक्कम परत न करणार्या विकासकांविरोधात वसुली आदेश (रिकव्हरी वॉरंट) जारी करण्यात आले आहेत. मात्र, संबंधित जिल्हाधिकार्यांकडून थकित वसुली वेगात होत नसून आजही तब्बल६८९.९८ कोटी रुपयांची थकित वसुली आहे. आता मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर आणि पुण्यातील थकित वसुलीला वेग देण्यात येणार आहे. राज्य सरकारने यासाठी या सहा जिल्ह्यांमध्ये १२ समर्पित महसूलवसुली अधिकार्यांची नियुक्ती केली आहे.
या सहा जिल्ह्यांत ६८९.९८कोटी रुपयांपैकी ६८४.५६कोटी रुपये थकित वसुली आहे. महसूल विभागाने 12 समर्पित महसूलवसुली अधिकार्यांच्या नियुक्तीमुळे संबंधित तक्रारदार ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
‘महारेरा’कडे मोठ्या संख्येने खासगी विकासकांविरोधात तक्रारी दाखल होत आहेत.
या तक्रारींनुसार ग्राहकांची फसवणूक झाल्याचे, ‘रेरा’ कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर तक्रारदाराने मालमत्तेसाठी विकासकाकडे भरलेली रक्कम व्याजासकट परत करण्याचे आदेश ‘महारेरा’कडून दिले जातात. मात्र या आदेशाचे पालन न करणार्या विकसकांविरोधात ‘महारेरा’कडून वसुली आदेश (रिकव्हरी वॉरंट) जारी करण्यात येतात.
त्यानुसार विकासकाची मालमत्ता जप्त करून तिच्या लिलावातून येणारी निश्चित रक्कम संबंधित तक्रारदाराला देण्यात येते. ही प्रक्रिया जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते.
मुंबई उपनगराकडे सर्वाधिक थकबाकी
आतापर्यंत ‘महारेरा’कडून एकूण ९१२.११ कोटी रुपयांचे वसुली आदेश देण्यात आले आहेत. त्यांपैकी आतापर्यंत केवळ २२२.१३ कोटी रुपयांची वसुली झाली असून ग्राहकांना त्यांचा परतावा करण्यात आला आहे. पण आजही तब्बल६८९.९८ कोटी रुपयांची थकित वसुली असून मोठ्या संख्येने ग्राहक भरपाईची, परताव्याची वाट पाहात आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे या सहा जिल्ह्यांमध्ये ही थकबाकी आहे. त्यातही मुंबई उपनगराकडे सर्वाधिक३२५.४३ कोटी रुपयांची थकित वसुली आहे. त्यापाठोपाठ पुण्याकडे १७७.३७ कोटींची वसुली थकित आहे.