अमृतसर: अट्टारी बॉर्डरवरून एक धक्कादायक घटना समोर आली. एका भारतीय महिलेने बॉर्डरवरच स्वतःला विष पिऊन संपवण्याची धमकी दिली. "माझे लग्न पाकिस्तानमध्ये झाले आहे. आम्ही मोठी रक्कम खर्च करून इथे कुटुंबियांना भेटायला आलो आहोत. माझे पती आणि मुले ह्यांना बॉर्डरपार करून पाकिस्तानात जाऊ दिले, मग मलाच का थांबवले?" असा सवाल तीने केला.
महिलेने स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर तिला पाकिस्तानात जाण्यास परवानगी दिली नाही, तर ती टोकाचं पाऊल उचलेल. या प्रकारामुळे सीमारेषेवर एकच खळबळ उसळली. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
तसेच, दुसऱ्या एका भारतीय महिलेनेही बॉर्डरवरील अधिकाऱ्यांना विनंती करत सांगितले की, "कृपया आम्हाला पाकिस्तानात जाऊ द्या."
या घटनेने दोन्ही देशांमधील नागरी संबंधांत गुंतागुंत र्निमाण झाली आहे हे समजते या प्रकरणाची चौकशी प्रशासनाकडून सुरू असून, संबंधित महिलांशी बोलून परिस्थितीवर तोडगा काढायचा प्रयत्न सुरू आहे. त्याबरोबरच, बॉर्डरवरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.