जम्मू काश्मीरमध्ये ६ दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त!

    26-Apr-2025
Total Views | 27
 Terrorists house
 
श्रीनगर : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरमध्ये ६ दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त केली आहे.
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत ६ दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली आहेत. यात आदिल गोजरी (बिजबेहरा), आसिफ शेख (त्राल), अहसान शेख (पुलवामा), शाहिद कुट्टे (शोपियां), जाकिर गनी (कुलगाम), हारिस अहमद (पुलवामा) या दहशतवाद्यांचा समावेश आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, यातील बिजबेहाराचा रहिवासी आदिल ठोकर हा २०१८ मध्ये पाकिस्तानला गेला असून तिथे त्याने दहशतवादी प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून तो देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच आसिफ शेख हा लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा स्थानिक कमांडर आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121