पाकिस्तानी नागरिकांनी तात्काळ भारत देश सोडावा, अन्यथा...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

    25-Apr-2025
Total Views | 32
 
Devendra Fadanvis
 
मुंबई : पाकिस्तानी नागरिकांनी वेळेत देश सोडून जावे. कुणी यात दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. शुक्रवा, २५ एप्रिल रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भारत सरकारने देशात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांना तात्काळ निघून जाण्यास सांगितले आहे. असे कोणकोणते नागरिक महाराष्ट्रात आहेत त्यांची यादी तयार झाली असून आम्ही मॉनिटरिंग करतो आहोत. त्यांनी वेळेत देश सोडून जावे यादृष्टीने देखरेख केली जाईल आणि कुणी यात दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. व्हिसा रद्द झालेला पाकिस्तानी नागरिक कुठल्याही परिस्थिती भारतात किंवा महाराष्ट्रात राहणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. पाकिस्तानी अभिनेते किंवा पाकिस्तानी खेळाडूंबद्दल आमच्या मनात कोणतीही सहानुभूती नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
 
हे वाचलंत का? -  निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
 
उबाठा गटाला जनता माफ करणार नाही!
 
"मला या गोष्टीचे अतिशय दु:ख आहे की, या देशाचा इतिहास ते विसरले. देशात युद्धाची वेळ असेल, युद्धसदृश परिस्थिती असेल, देशावर हल्ला असो किंवा देशाच्या संदर्भात एखादा विषय असो याबाबतीत देशातील राजकीय पक्षांनी कधीही पक्ष बघितलेला नाही, हा देशाचा इतिहास आहे. बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी देशात पक्षा-पक्षांमध्ये टोकाची लढाई सुरु होती. पण त्यावेळीसुद्धा अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना पूर्ण समर्थन दिले होते. हीच या देशाची परंपरा राहिली आहे. पण अशाही परिस्थितीत विरोध करणं, उपहास करणं, मुर्खासारखे वक्तव्य करणं हे उबाठा गटाकडून सुरु असून देशाची जनता त्यांना माफ करणार नाही," अशी टीकाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, डीडीए प्रशासनाने पोलिस आणि इतर विभागांसह सोमवार, दि. ५ मे रोजी तैमूर नगर नाल्याभोवतीच्या अतिक्रमणांविरुद्ध मोठी कारवाई केली. नाल्याच्या नऊ मीटर परिसरात असलेल्या अनेक बेकायदेशीर इमारती आणि त्यांच्या बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींनी नाल्याजवळील जमिनीवर अतिक्रमण केले होते. आतापर्यंत, बेकायदेशीरपणे बांधलेली १०० हून अधिक घरे आणि दुग्धशाळा पाडण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिस ..

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध : कृषी आयुक्त सुरज मांढरे

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध : कृषी आयुक्त सुरज मांढरे

(Agriculture Commissioner Suraj Mandhare) शासकीय कामात माहितीचे व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, कामाचे निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध आहेत या टूल्सचा वापर केला तर नक्कीच शासकीय कामकाजात गतिमानता येईल, असे मत कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केले. प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" अंतर्गत मंत्रलायामध्ये परिषद सभागृह, ६ वा मजला येथे 'तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर' या विषयावर कृषी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121