पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिठिकाणी बंद!

    24-Apr-2025
Total Views | 14
 
Parbhani
 
मुंबई : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संपूर्ण राज्य हादरले असून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान, गुरुवार, २४ एप्रिल रोजी या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला आहे.
 
मंगळवार, २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला. यात डोंबिवलीतील ३, पुण्यातील २ तर नवी मुंबईतील एका व्यक्तीचा समावेश आहे. या सगळ्यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हळहळले आहे.
 
हे वाचलंत का? -  पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द! पुढच्या तीन दिवसांत भारत सोडण्याचे आदेश
 
सर्वांनीच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील अतुल मोने, हेमंत जोशी,संजय लेले या तीन जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे शहरात गुरुवारी डोंबिवली बंदची हाक देण्यात आली. तसेच भाजपच्या वतीने डोंबिवलीतील इंदिरा चौकात निदर्शने करण्यात आली. यासोबतच परभणी, मालेगाव, अमरावती यासह अनेक ठिकाणी गुरुवारी बंद पाळण्यात आला.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121