पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिठिकाणी बंद!

    24-Apr-2025
Total Views | 15
 
Parbhani
 
मुंबई : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संपूर्ण राज्य हादरले असून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान, गुरुवार, २४ एप्रिल रोजी या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला आहे.
 
मंगळवार, २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला. यात डोंबिवलीतील ३, पुण्यातील २ तर नवी मुंबईतील एका व्यक्तीचा समावेश आहे. या सगळ्यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हळहळले आहे.
 
हे वाचलंत का? -  पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द! पुढच्या तीन दिवसांत भारत सोडण्याचे आदेश
 
सर्वांनीच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील अतुल मोने, हेमंत जोशी,संजय लेले या तीन जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे शहरात गुरुवारी डोंबिवली बंदची हाक देण्यात आली. तसेच भाजपच्या वतीने डोंबिवलीतील इंदिरा चौकात निदर्शने करण्यात आली. यासोबतच परभणी, मालेगाव, अमरावती यासह अनेक ठिकाणी गुरुवारी बंद पाळण्यात आला.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121