पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे निदर्शने!

    23-Apr-2025
Total Views | 13
 
BJP
 
मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार, २३ एप्रिल रोजी भाजपतर्फे ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली.
 
भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुंबई अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्‍याड हल्‍ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. यावेळी यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष वासिम खान, उपाध्यक्ष सलमान खान, मासुक सिद्दीकी, हुसेन खान, अलताफ शेख, आदिल शेख, जहांगीर खान यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
दरम्यान, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘आतंकवाद मुर्दाबाद’ अशा घोषणांचे फलक फलक हातात घेऊन हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मोदी सरकारच्या समर्थनार्थ ‘अमितभाई आगे बढो हम तुम्हारे साथ है’ या आशयाचे फलकही हातात घेण्यात आले होते.
 
यासोबतच उत्तर मुंबईमध्येही निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आ. अतुल भातखळकर, आ. योगेश सागर, आ. मनीषा चौधरी, माजी खासदार गोपाळ शेट्टी, ज्येष्ठ नेते भाई गिरकर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आदी उपस्थित होते. यावेळी लवकरात लवकर दहशतवादाची ही कीड संपवावी, असे आवाहनही केंद्र सरकारला करण्यात आले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121