बांगलादेशात पुन्हा हिंदू नेत्याची हत्या, भारतानं युनुस सरकारला सुनावले खडेबोल!

    19-Apr-2025   
Total Views | 19
 
India Slams Bangladesh After Hindu Leader
 
 
नवी दिल्ली : (India Slams Bangladesh After Hindu Leader's Murder) बांगलादेशातील दिनाजपूर येथील एका हिंदू समुदायाच्या नेत्याचे त्यांच्या घरातून अपहरण करून त्यांना मारहाण करून त्यांची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध व्यक्त करत बांगलादेशात युनुस सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
 
बांगलादेशातील दिनाजपूर येथे ५८ वर्षीय हिंदू नेते भावेश चंद्र रॉय यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. भावेश चंद्र रॉय हे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक समुदायाचे एक प्रमुख नेते होते. बांगलादेश पूजा उत्सव परिषदेच्या बिरल युनिटचे उपाध्यक्षपदही भूषविले होते. यावर भारत सरकारने मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारचा निषेध केला आहे. सर्व नागरिकांना समान सुरक्षा प्रदान करणे ही त्यांची संवैधानिक आणि नैतिक जबाबदारी आहे, याची आठवण भारताने बांगलादेश सरकारला करून दिली.
 
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शनिवारी एक्सवर या घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक नेते भावेश चंद्र रॉय यांचे अपहरण आणि क्रूर हत्या दुर्दैवी आहे. या हत्याकांडामुळे अंतरिम सरकारच्या काळात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या पद्धतशीर छळाची पुनरावृत्ती होत आहे. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारने कोणत्याही सबबीशिवाय आणि भेदभावाशिवाय हिंदूसह सर्व अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडावी",असे म्हटले आहे.
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
अग्रलेख
जरुर वाचा
“कुशल मनुष्यबळ हेच महानिर्मितीचे बलस्थान” - राधाकृष्णन बी

“कुशल मनुष्यबळ हेच महानिर्मितीचे बलस्थान” - राधाकृष्णन बी

गतकाळातील कार्याचा आढावा घेत नवे संकल्प करण्याचा आजचा दिवस असून राज्याच्या भविष्यातील विजेची गरज पूर्ण करण्याकरता कार्यक्षमता वृद्धी आणि तंत्रकुशल होणे गरजचे आहे. मुख्यमंत्री यांचे नेतृत्वामध्ये अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प गतीने पुर्ण करण्यास महानिर्मिती प्राधान्य देत असून महानिर्मितीचे व्हिजन २०३५ द्वारे आपण शाश्वत हरित ऊर्जेच्या दिशेने प्रवास करत असल्याचे प्रतिपादन, राधाकृष्णन बी., अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती यांनी केले. ते महानिर्मितीच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त रंगशारदा सभागृहात आयोजित ..

देशात नावलौकिक मिळवणाऱ्या महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कटिबद्ध व्हावे - लोकेश चंद्र

देशात नावलौकिक मिळवणाऱ्या महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कटिबद्ध व्हावे - लोकेश चंद्र

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अशा योजनांच्या अंमलबजावणीत महावितरणने देशात नावलौकिक मिळवला असून ऊर्जा परिवर्तनाचे महावितरणचे मॉडेल जगासाठी मोठे उदाहरण ठरणार आहे. महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हे शक्य झाले आहे.परंतु महावितरणला आर्थिकदृष्टया अधिक सक्षम करणे गरजेचे असून त्यासाठी सर्वानीच कटिबद्ध होऊन मिशन मोड वर काम करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121