"...आधी स्वतःच्या देशाकडे पाहा" भारतानं बांगलादेशला कडक शब्दांत फटकारलं!

मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या विधानाचा घेतला समाचार

    18-Apr-2025   
Total Views |

India slams Bangladesh remark on Murshidabad Violence: 
 
नवी दिल्ली : (India slams Bangladesh remark on Murshidabad Violence) गेल्या काही दिवसापासून पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात हिंसाचाराची मालिका सुरु आहे. या हिंसाचारावर बांगलादेशने केलेल्या विधानाचा समाचार घेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्युत्तर देताना चांगलीच समज दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी "बांगलादेशने आधी स्वतःच्या देशाकडे पाहावे. आणि आमच्या देशांतर्गत विषयामध्ये ढवळाढवळ करण्याची गरज नाही.", अश्या शब्दात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशला फटकारले आहे.
 
पुढे बोलताना रणधीर जयस्वाल म्हणाले की, "पश्चिम बंगालमधील घटनांबाबत बांगलादेशच्या बाजूने केलेल्या टिप्पण्या आम्ही नाकारतो. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर सुरू असलेल्या छळाबद्दल भारत चिंता व्यक्त करत असताना त्याच्याशी तुलना करण्याचा बांगलादेशचा हा एक छूपा आणि कपटी प्रयत्न आहे, जिथे अशा कृत्यांचे गुन्हेगार मोकाट फिरत राहतात. बांगलादेशने अश्या अनावश्यक टिप्पण्या करुन सद्गुणी असल्याचा आव आणण्याऐवजीस्वतःच्या देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करणं अधिक गरजेचं आहे," असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
 
मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर बांगलादेशने अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाचे रक्षण केले पाहिजे, असे आवाहान केले होते. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांचे प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी गुरुवारी १७ एप्रिल रोजी एका मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की, मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात बांगलादेशचा कोणताही सहभाग नाही. ते म्हणाले, "मुर्शिदाबादमधील सांप्रदायिक हिंसाचारात बांगलादेशला गोवण्याच्या प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो, मुस्लिमांवरील हल्ल्यांमुळे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होत आहे, याचा आम्ही निषेध करतो," असे त्यांनी म्हटले होते. ते पुढे म्हणाले, "आम्ही भारत सरकार आणि पश्चिम बंगालला अल्पसंख्याक मुस्लिम लोकसंख्येचे पूर्णपणे संरक्षण करण्यासाठी सर्व पावले उचलण्याची विनंती करतो."
 
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
अग्रलेख
जरुर वाचा
पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे. तसेच पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121