राऊतांचं नाव संजय तेढकर असायला हवं! असं का म्हणाले रवींद्र चव्हाण?

    14-Apr-2025
Total Views | 25
 
Sanjay Raut
 
मुंबई : संजय राऊत यांचे नाव खरंतर संजय तेढकर असायला हवं, असा घणाघात भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. सामना वृत्तपत्रात आलेल्या अग्रलेखावर त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले.
 
रवींद्र चव्हाण म्हणाले की, "समाजा समाजात तेढ निर्माण करून सामन्याची मजा घेणाऱ्या संपादकाने फुले विरुद्ध फडणवीस हा अग्रलेख समाज प्रबोधनासाठी नव्हे तर समाज विघटनासाठी लिहिला आहे. त्यांचे नाव खरंतर संजय तेढकर असायला हवे. आपल्या लेखणीतून, वक्तव्यातून आणि कृतीतुन सतत समाजा-समाजात तेढ निर्माण करणे एवढेच या संपादक महाशयांनी केले आहे आणि तेवढेच त्यांना येते," अशी टीका त्यांनी केली.
 
 
ते पुढे म्हणाले की, "देवेंद्रजी महाराष्ट्राचे नेते आहेत. अंत्योदय आणि मानवतेची विचारधारा रुजविणाऱ्या शामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्यायजींना आदर्श मानणारे नेते आहेत, हे अवघ्या महाराष्ट्राची जनता जाणते. त्यामुळे अहो तेढकर, सावित्रीमाईंच्या शब्दात सांगायचे झाले तर मानवाचे नाते, ओळखती जे ते, सावित्री वदते ते संत. सावित्रीमाईंचे काव्यफुले मधलेच हे शब्द आहेत आणि तीच आमची विचारधाराही," असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
एआयच्या मदतीने जनसंपर्कातील कामे प्रभावीपणे करा : ब्रिजेश सिंह`पीआरएसआय`च्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिवस उत्साहात साजरा

एआयच्या मदतीने जनसंपर्कातील कामे प्रभावीपणे करा : ब्रिजेश सिंह`पीआरएसआय`च्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिवस उत्साहात साजरा

``आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुध्दिमत्ता हे व्यवस्थापन व संवाद क्षेत्रात एक प्रभावी साधन ठरत आहे. जनसंपर्क क्षेत्र हे विश्वासावर चालते. कृत्रिम बुध्दिमत्ता आणि चॅटजीपीटी आदीसारख्या तंत्रज्ञानांनी मोठा बदल घडवून आणला आहे. एआय, चॅटजीपीटी, कॅनव्हा आदी सगळी साधने आहेत, याचा वापर योग्यरित्या करायला शिका. या साधनांचा उपयोग करून जनसंपर्क क्षेत्रातील कामे अधिक चांगली आणि प्रभावीपणे करावीत``, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले...

धर्मादाय रूग्णालयांच्या संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय विशेष तपासणी पथक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

धर्मादाय रूग्णालयांच्या संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय विशेष तपासणी पथक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

राज्यातील धर्मादाय रूग्णालयांकडून निर्धन, गरीब रूग्णांवर उपचार मोफत व्हावेत. रूग्णालयांनी शिल्लक खाटा, निर्धन रूग्ण निधींची माहिती (आयपीएफ) ऑनलाईन प्रणालीत नोंद करावी. काही रूग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी येतात . या सर्व बाबींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी ..

माझ्या वडिलांना कलमा पठण करण्यास सांगितले आणि....!, लेकीने सांगितला पहलगाममधील घटनाक्रम

माझ्या वडिलांना कलमा पठण करण्यास सांगितले आणि....!, लेकीने सांगितला पहलगाममधील घटनाक्रम

Pahalgam जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २८ पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा पहिला स्केच आणि ग्रुप फोटो समोर आला आहे. आता संबंधित दहशतवाद्यांची स्केचद्वारे ओळख पटली असून त्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमन शाह आणि अबू तल्हा अशी नावे आहेत. हे दहशतवादी द रेझिस्टंस फ्रंटचे असल्याचे सांगितले जात आहे. ही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाचा सहयोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शीची चौकशी करण्यात आल्यानंतर हे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. सूत्रानुसार, केंद्रीय तपास संस्था, एनआयए ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121