'तो' दिवस म्हणजे भारताच्या इतिहासातील काळा अध्याय :पंतप्रधान नरेंद्र मोदी

    13-Apr-2025
Total Views | 21

modi jallianwala bagh

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १३ एप्रिल रोजी सकाळी आपल्या एक्स मिडीया हँडल वरुन समस्त भारतीयांना बैसाखीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. उत्तर भारतामध्ये बैसाखीचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यावेळी १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियनवाला हत्याकांडाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की "हा दिवस म्हणजे भारताच्या इतिहासातील काळा अध्याय आहे."

जालियनवाला बाग येथे नेमके काय घडले होते ?
इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतात, मोठ्या प्रमाणात भारतीयांचे शोषण केले जात असे. १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरच्या जालियनवाला बाग येथे हजारो लोक बैसाखीचा पवित्र सण साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे सत्यपाल व सैफुदीन किचलू यांच्या अटकेच्या विरोधात काही लोकं निदर्शनं करत होती. अशातच जनरल डायर आणि पोलिसांनी जलियनवाला बाग येथे प्रवेश करत बाहेर जाण्याचे सगळे रस्ते बंद केले. यानंतर जनरल डायर आणि पोलिसांनी बेछूट गोळीबार करत हजारो लोकांचे प्राण घेतले. यामध्ये निष्पाप लहान मुलं तसेच बायकांचा सुद्धा समावेश होता.

पंतप्रधान काय म्हणाले ?
जालियानवाला बाग येथे घडलेल्या हत्याकांडाविषयी भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की हा भारताच्या इतिहासातील काळा अध्याय होता. जालियनवाला बाग येथील लोकांच्या बलिदानामुळे भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. येणाऱ्या पिढ्या त्यांचे बलिदान कदापि विसरणार नाही.

अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121