रोमन कॅथलिकां’नाच घर मिळेल!

- वांद्य्रातील सोसायटीचे फर्मान; उच्च न्यायालयाने दिला दणका

    12-Apr-2025
Total Views | 17
 
 Only Roman Catholics will get house bandra
 
 
मुंबई: ( Only Roman Catholics will get house bandra ) महाराष्ट्रात धार्मिक अतिक्रमणांचे प्रकार वाढत असताना आता वांद्य्रातील एका सोसायटीने “येथे केवळ ‘रोमन कॅथलिकां’नाच घर मिळेल,” असे फर्मान सोडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याविरोधात पीडितांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी कठोर शब्दांत कानउघाडणी केली.
 
वांद्रे येथील ‘सेलस्टेलाईट गृहनिर्माण सोसायटी’ने सदस्यांसाठी नियम तयार केला. सोसायटीचा सदस्य रोमन कॅथलिकच असावा, असा हा नियम आहे. या नियमानुसार काही सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश सहकार अपील न्यायालयाने दिले. त्याविरोधात जिमा नंरोहा आणि अन्य सदस्यांनी याचिका दाखल केली आहे. सोसायटीचा मुख्य हेतू हा घर देण्याचा असावा. धार्मिक किंवा सांप्रदायिक सेवा देणे, हे सोसायटीचे काम नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला.
 
घरमालक आमच्याच धर्माचा असावा, असे म्हणणार्‍या गृहनिर्माण सोसायटीला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली. तसेच घरे रिकामी करण्याच्या सहकार अपील न्यायालयच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली. घरे रिकामी करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली नाही, तर संबंधित घरमालकावर अन्याय होईल. त्यामुळे हे आदेश स्थगित केले जात आहेत.
 
या मुद्द्यावर तातडीने सुनावणी घ्यायची असल्यास सोसायटी न्यायालयाच्या उन्हाळ्याच्या सुटीनंतर अर्ज करू शकते, असेही न्या. अमित बोरकर यांच्या एकलपीठाने आदेश नमूद केले. या याचिकेत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. धर्माच्या आधारावर घराची मालकी निश्चित केली जाऊ शकते की नाही, यावर सविस्तर सुनावणी आवश्यक आहे. कारण हे सर्व सोसायटी व सदस्यांच्या अधिकारांवर परिणाम करणारे आहे. संविधानाने दिलेला समानतेचा अधिकारही अबाधित राहयला हवा. यात समतोल ठेवायला हवा, असेही न्यायालयाने नमूद केले.
 
धर्माच्या आधारावर घराबाहेर काढता येते का?
 
धर्माच्या आधारावर एखाद्या सदस्याला घराबाहेर काढण्याचा नियम सोसायटी करु शकते का? असा नियम करणे योग्य आहे का? पुनर्विकासात संबंधित सदस्याचा सहभाग असताना नंतर असा धर्माच्या आधारावर नियम केला जाऊ शकतो का? या नियमाच्या आधारावर सदस्याला घराबाहेर काढता येईल का? या मुद्द्यांवर सुनावणी घेणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121