"पालिका निवडणूक जवळ आल्यावर काहीजणांना...."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खोचक टीका

मुंबईतील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

    12-Apr-2025
Total Views | 33
 
Eknath Shinde
 
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्यावर काहीजणांना मुंबईकरांची आठवण येते, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शुक्रवार, ११ एप्रिल रोजी मुंबईतील विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
 
मुंबईतील उबाठा गट, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, आरपीआय, लोक जनशक्ती पार्टी तसेच बंजारा समाजाचे अनेक पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुक्तागिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना महिला नेत्या मीना कांबळी, आमदार प्रा. मनीषा कायंदे, ज्येष्ठ माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक पांडुरंग पाटील तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये दक्षिण मुंबई, अणुशक्ती नगर, चेंबूर, विक्रोळी, गोरेगाव आरे कॉलनीतील आदिवासी आणि पारधी बांधव, उबाठा गटाचे रवी आचारी, शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष सुमीत वजाळे यांचा समावेश आहे. यासोबतच मनसेचे सतीश यादव, मुश्ताक शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते, आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब पगारे, बापू जगदने, लोक जनशक्ती पार्टी मुंबई अध्यक्ष किरण माने, मुंबई संपर्कप्रमुख अखिलेश राव, प्रफुल पवार, सुंदर पाटील, तुषार खानोलकर, युवराज पाटील, कैलास सोलंकी यांचाही समावेश आहे.
 
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्यावर काही जणांना मुंबईकरांची आठवण येते. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई वेगळी करणार अशी जुनी कॅसेट त्यांच्याकडून वाजवली जाते. पण महायुती सरकारने सर्वसामान्य मुंबईकरांचे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प सहा शासकीय संस्था एकत्रित करून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत," असे ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121