अखेर 58 आदिवासी कुटुंबांना मिळणार वास्तव्याचा अधिकार

- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका; खा. डॉ. हेमंत सवरा यांची शिष्टाई

    12-Apr-2025
Total Views | 8

Chandrashekhar Bawankule on tribal families
 
वाडा: ( Chandrashekhar Bawankule on tribal families ) अल्याळी (नवापाडा) येथील ५८ आदिवासी भूमिहीन कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी मंत्रालयात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या कुटुंबांना आता अधिकृतपणे वास्तव्याचा अधिकार मिळणार आहे. गेली ४० वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या या कुटुंबांना शासनाच्या विविध विभागांकडून पूर्वीच मंजुरी मिळालेली आहे.
 
या रहिवाशांना आधीच नगर परिषद, वनविभाग तसेच अन्य संबंधित विभागांकडून परवानगी मिळालेली असून २०१४ पासून त्यांच्या वास्तव्यासाठी जमिनीचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, अद्याप त्यांना अधिकृत हक्क मिळाले नव्हते. २०११ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बांधकामे जमीनदोस्त करण्याबाबतचे आदेश निघालेले असताना खा. डॉ. हेमंत सवरा यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी त्वरित संपर्क साधून जिल्हाधिकार्‍यांमार्फत कारवाई थांबवण्याचे निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले होते.
 
यावर तोडगा काढण्यासाठी महसूलमंत्र्यांची भेट घेऊन बैठकीचे नियोजन करण्याबाबत विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 
कायदेशीर हक्क निश्चित करण्याचे निर्देश
 
जुना सर्व्हे क्र. ६५ व नवीन गट क्र. १९८ या जमिनीवर त्यांचा वास्तविक आणि कायदेशीर हक्क निश्चित करण्यासाठी कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले. गेल्या चार दशकांपासून संघर्ष करत असलेल्या या कुटुंबांच्या न्यायासाठी २०१४ पासून सातत्याने प्रयत्न केले जात होते. विविध शासकीय विभागांनी मंजुरी दिल्यानंतरही प्रक्रिया रखडलेली होती.
 
आजच्या निर्णयामुळे त्यांचा संघर्ष थांबून सन्मानाने आणि अधिकृतपणे वास्तव्याचा अधिकार मिळणार आहे. बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी इंदुरणी जाखड, तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि विभागीय प्रतिनिधी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबईतील विलेपार्लेत महापालिकेने ९० वर्षांपूर्वील जैन मंदिर पाडल्याने श्रद्धाळूंची निदर्शने

मुंबईतील विलेपार्लेत महापालिकेने ९० वर्षांपूर्वील जैन मंदिर पाडल्याने श्रद्धाळूंची निदर्शने

Mumbai Municipal Corporation ने जैन मंदिर पाडल्याने जैन समाजाने एकत्र येत निदर्शने केली आहेत. मुंबईतील विलेपार्ले विभागत असणार्‍या ९० वर्षांपूर्वील जैन मंदिर पाडण्यात आले. श्री १००८ पाश्वर्थनाथ देरासर, अवैध असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. हे प्रकरण वर्षानुवर्षे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले जरी असते तरीही मंदिर समितीच्या बाजूने कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.मंदिर पाडण्याची स्थगिती देण्यासाठी भाविकांनी अंतिम क्षणी न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु कोणतीही सुनावणी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121