"रायगडला केवळ पर्यटनस्थळ नव्हे तर..."; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

    12-Apr-2025
Total Views | 45
 
Amit Shah
 
रायगड : रायगडला केवळ पर्यटनस्थल नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "याच जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. बाल शिवाजीच्या जन्मापासून तर त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंचा इतिहास या पवित्र भूमीत आहे. रायगडला केवळ पर्यटनस्थळ नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे. सातवीपासून ते बारावीपर्यंतचा प्रत्येक विद्यार्थी एकदातरी या प्रेरणास्थळावर आला पाहिजे. ही स्वराज्याची, स्वधर्माच्या सन्मानाची आणि स्वभाषेला अमर करण्याची लढाई कधीही थांबू नये, हा शिवरायांचा अंतम संदेश होता. मोदीजींच्या नेतृत्वात ही लढाई शिवरायांची वाजी ही लढाई गौरवाने पुढे जात आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "शिवरायांना केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका तर..."; गृहमंत्री अमित शाह यांचे रायगडावरून आवाहन
 
शिवरायांनी तीन विचार जगासमोर ठेवले
 
"स्वधर्माचा अभिमान, स्वराज्याची आकांक्षा आणि स्वभाषेला अमर बनवणे हे तीन विचार देशाच्या सीमेशी जोडलेले नसून मानवी जीवनाच्या स्वाभिमानाशी जोडले आहेत. या तीन मूळ चरित्रांना शिवाजी महाराजांनी जगासमोर ठेवले. गुलामगिरीची मानसिकतेला छेद देत शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्याच्या सूर्याला दैदिप्यमान करण्याचे काम केले," असेही अमित शाह यावेळी म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121