प्रत्येकाने आपल्या गावात ग्रामविकासाचे कार्य सुरू करावे : विनय कानडे

    07-Mar-2025
Total Views | 42

Rambhau Mhalagi Smrutidin Chhatrapati Shivaji Mandal Kalyan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Rambhau Mhalagi Smrutidin) 
छत्रपती शिक्षण मंडळच्या वतीने दरवर्षी स्व. रामभाऊ म्हाळगी स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाही गुरुवार, दि. ६ मार्च रोजी नुतन विद्यालय, कर्णिक रोड, कल्याण (प) येथील भव्य प्रांगणावर स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय ग्रामविकास प्रमुख विनय कानडे यांनी उपस्थितांना ग्रामविकासातून राष्ट्रविकास या विषयी संबोधित केले. आपल्या गावामध्ये ग्रामविकासाचे कार्य सुरू करण्याबाबात आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

हे वाचलंत का? : भारत-न्यूझिलंड सामन्यापूर्वी काँग्रेसी झाले रामभक्त

ते म्हणाले, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या काळच्या राजकीय नेत्यांनी जाणून बुजून शहरात उद्योग उभे केले व शहरे भरली, त्यामुळे गावाकडे दुर्लक्ष झाले. तसेच ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी आपल्या सर्वांसमोर ग्रामविकासाचे एक आदर्श गाव उभे केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ४५० गावी ग्रामविकासाचे प्रकल्प सुरु आहेत. उपस्थिती सर्वांनी आपल्या गावाशी संबंध ठेवावा व आपल्या गावामधे ग्रामविकासाचे कार्य सुरू करावे.

या कार्यक्रमाल छत्रपती शिक्षण मंडळाच्या विविध शाळांतील शिक्षक उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने नागरिक बंधु भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सरचिटणीस डॉ. निलेश रेवगडे यांनी केले, तर संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य फडके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला, कार्याध्यक्ष तरटे सर यांनी स्वर्गीय रामभाऊ माळगी यांच्या कार्याबद्दलची माहिती सांगितली सुरुवातीस महाराष्ट्र गीत होऊन संपुर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रम संपन्न झाला.

अग्रलेख
जरुर वाचा
अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना नाना पटोले यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना नाना पटोले यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

Nana Patole उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर खुर्च्यांच्या अदलाबदलीवरून चर्चाही झाल्या. त्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, असे नाना पटोले म्हणाले. यामुळे आता राज्याच्या राजकीय परिस्थितीत उलथापालथ ..

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..