संघाची अ. भा. प्रतिनिधी सभा यंदा बंगळुरूत

    06-Mar-2025
Total Views |
 
RSS Akhil Bharatiya Pratinidhi Sabha Bengaluru

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS Bengaluru Baithak News)
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यंदा बंगळुरू येथे होत आहे. बंगळुरूच्या चन्नेनहल्ली येथील जनसेवा विद्या केंद्र परिसरात ही तीन दिवसीय (२१, २२, २३ मार्च) बैठक संपन्न होणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा.प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली. 

हे वाचलंत का? :आधी अजान कोणाची? वादाचे रुपांतर तुफान हाणामारीत

यावेळी २०२४-२५ च्या शेवटच्या वर्षाचे इतिवृत्त ठेवण्यात येणार असून त्यावर विवेचनात्मक चर्चा करण्याबरोबरच विशेष कामांसाठी विनंतीही करण्यात येणार आहे. येत्या विजयादशमीला संघाच्या कार्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, २०२५ ते २०२६ हे वर्ष संघाचे शताब्दी वर्ष म्हणून मानले जाईल. बैठकीत शताब्दी वर्षाच्या कार्याच्या व्याप्तीचा आढावा घेण्याबरोबरच आगामी शताब्दी वर्षासाठी विविध कार्यक्रमांची रूपरेषा तयार करण्यात येणार आहे.

बैठकीत राष्ट्रीय विषयांवरील दोन प्रस्तावांवर विचार करण्यात येणार आहे. तसेच संघ शाखांकडून आवश्यक असलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासह पंचपरिवर्तनासाठीच्या प्रयत्नांची चर्चा विशेषतः अपेक्षित आहे. हिंदुत्व प्रबोधनासह देशातील सद्य परिस्थितीचे विश्लेषण आणि आवश्यक कृतींची चर्चाही बैठकीच्या विषय यादीत समाविष्ट आहे.

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे आणि सर्व सहा सह सरकार्यवाह तसेच कार्यकारिणी सदस्यांसह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने राज्य व प्रदेश पातळीवरील १४८० कार्यकर्ते अपेक्षित आहेत. या बैठकीत संघप्रणित विविध संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, सरचिटणीस आणि संघटन मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना नाना पटोले यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना नाना पटोले यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

Nana Patole उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर खुर्च्यांच्या अदलाबदलीवरून चर्चाही झाल्या. त्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, असे नाना पटोले म्हणाले. यामुळे आता राज्याच्या राजकीय परिस्थितीत उलथापालथ ..

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..