देशविरोधी खेळाचा पर्दाफाश

    04-Mar-2025   
Total Views | 71

Chandan Gupta case update

उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये २०१८ साली, चंदन गुप्ता नामक तरुणाची जिहाद्यांनी हत्या केली होती. विशेष म्हणजे, चंदन गुप्ता आणि त्याच्या सहकार्‍यांनी, कासगंजमध्ये तिरंगा यात्रा काढली होती. शहरातील विविध भागांतून जाणारी ही यात्रा, कासगंजमधील मुस्लीमबहुल भागांतूनही गेली होती. मुस्लीमबहुल भागांतूनही ही यात्रा काढल्याच्या रागातून, खून आणि दंगल घडविण्याचा आरोप ३० कट्टरतावाद्यांवर ठेवण्यात आला होता.
 
 
त्यानंतर तब्बल सात वर्षांनी, ‘एनआयए’ विशेष न्यायालयाने या प्रकरणातील ३० पैकी २८ आरोपींना शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने २८ आरोपींना, आयपीसीच्या ‘कलम १४७’, ‘१४८’, ‘३०७/१४९’, ‘३०२/१४९’, ‘३४१’, ‘३३६’, ‘५०४’, ‘५०६’ अंतर्गत दोषी ठरवले. आरोपींमध्ये अजीजुद्दीन, मुनाजिर, आसिफ, असलम, शबाब, साकिब, आमिर रफी, सलीम, वसीम, नसीम, बबलू, अक्रम, तौफिक, मोहसीन, राहत, सलमान, आसिफ, निशू, वासिफ, इम्रान, शमशाद, जफर, शाकीर, खालिद परवेझ, फैजान, इम्रान, शाकीर, जाहिद यांचा समावेश आहे.
 
‘एनआयए’ विशेष न्यायालयाने गुन्हेगारांना शिक्षा तर केली आहेच; मात्र आपल्या निकालपत्रामध्ये विशेष न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी कट्टरतावादी, एनजीओ, त्यांचे परदेशी आश्रयदाते आणि भारताची राष्ट्रीय सुरक्षा याविषयी अतिशय महत्त्वाच्या टिप्पण्या केल्या आहेत. त्यामुळे ‘एनआयए’ विशेष न्यायालयाच्या या निकालाकडे, केवळ चंदन गुप्तास न्याय मिळाला असे न पाहता, देशात जाणीवपूर्वक धुमाकूळ घालणार्‍या ‘एनजीओ’ नामक अराजकतावादास उघडे पाडणारा निकाल असेही बघावे लागेल.
 
या प्रकरणात विशेष न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी, ‘एनजीओ’ इकोसिस्टमने कसा धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला, हे अतिशय सविस्तरपणे नमूद केले आहे. न्यायालयाने निकालामध्ये ‘अलायन्स फॉर जस्टिस अ‍ॅण्ड अकाऊंटेबिलिटी, न्यूयॉर्क’, ‘सिटीझन्स फॉर जस्टिस अ‍ॅण्ड पीस, मुंबई’, ‘इंडियन अमेरिकन मुस्लीम काऊन्सिल, वॉशिंग्टन डी.सी.’, ‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज, नवी दिल्ली’, ‘रिहाई मंच, लखनऊ’, ‘साऊथ एशिया सॉलिडॅरिटी ग्रुप, लंडन’, ‘युनायटेड अगेन्स्ट हेट, नवी दिल्ली’, या एनजीओ आणि त्यांनी तयार केलेला अहवाल ‘इंडिपेन्डन्ट इन्व्हेस्टिगेशन - ट्रुथ ऑफ कासगंज’ अर्थात बनावट पोलीस तपासाने ‘हिंदूंना वाचवले, मुस्लिमांना अडकवले’ यावर कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत. या सर्व एनजीओने या प्रकरणामध्ये जे काही प्रसारित केले, त्यासाठी घटनास्थळी जाण्याचे त्यांनी टाळले आहे. म्हणजेच, या सर्व एनजीओने या प्रकरणामध्ये, मोठ्या प्रमाणात खोट्या गोष्टी प्रसारित केल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
 
या निकालात न्यायाधीशांनी, आणखी एका पॅटर्नकडे लक्ष वेधले आहे. विशेष एनआयए न्यायालयात अनेकदा असे आढळून आले आहे की, जेव्हा जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पंजाब इत्यादी राज्यांमधून एखाद्या आरोपीला दहशतवाद, बनावट चलन, भारत सरकार विरुद्धचे युद्ध, गोपनीय माहितीची हेरगिरी आणि इतर देशविरोधी कारवाया इत्यादी गुन्ह्यांसाठी अटक केली जाते, त्यावेळी त्यांना न्यायालयात तपास यंत्रणांतर्फे हजर केले जाते. अशावेळी अनेकदा वर उल्लेख केलेल्या एनजीओशी संबंधित वकील, न्यायालयात अगोदरच उपस्थित असल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले आहे. कायदेशीर मदत मिळणे हा प्रत्येक आरोपीचा अधिकार आहे. मात्र, अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना मोफत कायदेशीर मदत देणे, हा कोणत्याही स्वयंसेवी संस्थेचा एकमेव अधिकार असू शकत नाही, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे.
  
निकालपत्रामध्ये न्यायालयाची एक टिप्पणी फार महत्त्वाची आहे. ती टिप्पणीच या एनजीओ इकोसिस्टमला खरा हेतू स्पष्ट करणारी आहे. एखाद्या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या वकिलाच्या युक्तिवादामुळे जर एखाद्या आरोपीची निर्दोष मुक्तता झाली, तर त्याची निष्ठा त्या स्वयंसेवी संस्थेच्या बाजूने आणि राज्याविरुद्ध निर्माण होते. त्याचवेळी, जेव्हा एखाद्या आरोपीला राज्याने प्रदान केलेल्या संरक्षण परिषद अथवा ‘अ‍ॅमिकस क्युरी’द्वारे प्रदान केलेल्या वकिली युक्तीवादाचा लाभ मिळतो, तेव्हा त्याचा राज्याच्या न्यायव्यवस्थेवर आणि भारतीय संविधानावर विश्वास वाढतो. त्यामुळे विविध स्वयंसेवी संस्थांची देशविरोधी आरोपींना बचाव करण्याची ही प्रवृत्ती, न्यायव्यवस्थेबद्दल अतिशय संकुचित आणि धोकादायक विचारसरणी वाढवण्यात सहकार्य करत असल्याचे, न्यायालयाने अतिशय स्पष्ट शब्दात नमूद केले आहे.
 
भारतासह संपूर्ण जगभरात सध्या, ’युएसएड’ हा चर्चेचा विषय झाला आहे. ’युएसएड’ने भारतात मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी सक्रिय काम केले, असे खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीच म्हटले आहे, हे झाले भारताचे. भारताशिवाय जगातील अनेक देशांमध्ये, अस्थिरता निर्माण करण्याचे काम झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. अर्थात, अशाप्रकारे वारेमाप पैसा उधळून, अन्य देशात अस्थिरता निर्माण करण्याचे काम केवळ ’युएसएड’च करते असेही नाही. जागतिक स्तरावर असे काम करणारा, ‘ओपन सोसायटी’चा जॉर्ज सोरोस तर कुख्यात आहेच. तरही जागतिक अराजकतावादी मंडळी प्रामुख्याने विविध एनजीओंना हाती धरतात किंवा अनेकदा अशा एनजीओ, जन्मासही घातल्या जातात. त्यानंतर या एनजीओ देशातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, न्यायिक कार्यपालिका अशा क्षेत्रांमध्ये, आपली माणसे पेरतात आणि त्याद्वारे व्यवस्थेत अराजकता पसरविण्याचा प्रयत्न करतात.
 
अशा एनजीओ अनेकदा, सिव्हील सोसायटी असे अतिशय गोंडस नावही घेतात. अशा काही एनजीओ राजकीय पक्ष बनून, सत्तेतही येतात. एकूणच देशाच्या विविध व्यवस्थांवर दबाव निर्माण करणे, व्यवस्थांविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात राग, द्वेष आणि चीड निर्माण करण्याचे व दिशाभूल करून, व्यवस्थांना आपल्या सोयीचे निर्णय घेण्यास भाग पाडण्याचे काम या एनजीओ करतात. न्यायालयाने या निकालाची एक प्रत ‘बार काऊन्सिल ऑफ इंडिया’ आणि केंद्रीय गृहमंत्रालयास पाठवली असून, या प्रकरणात सक्रिय असलेल्या एनजीओचा, नेमका हेतू तपासण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा अनेक प्रकरणातील एनजीओची भूमिका आता तपास यंत्रणांचा रडारवर येऊन, व्यापक साफसफाई होणार, अशी आशा करण्यास हरकत नसावी.

अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...