मुंबईतील रस्त्यांवरच्या डांबराचे ‘सांबार’ कुणी खाल्ले?

कार्यकर्त्यांनो पेटवा मशाल, आम्ही झोपतो खुशाल!

    27-Mar-2025
Total Views | 9

eknath shinde on UBT 
 
मुंबई: ( eknath shinde on UBT ) “मुंबईच्या रस्त्यांवरून काहीजण प्रश्न विचारत आहेत. पण, इतकी वर्षे डांबराचे ‘सांबार’ कुणी खाल्ले? हे त्यांनी स्पष्ट करावे. आरशात पाहून वारसा सांगता येत नाही,” असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला लगावला. विधान परिषदेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते उत्तर देत होते.
 
शिंदे म्हणाले, “कार्यकर्त्यांनो ‘पेटवा मशाल, आम्ही झोपतो खुशाल,’ अशी यांची अवस्था आहे. ते कार्यकर्त्यांना कचरा समजतात. त्यामुळेच त्यांना आम्ही हायव्होल्टेज शॉक दिला. सध्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू आहे. त्यामुळे लोकांना थोडा त्रास होतो आहे. परंतु, त्यानंतर पुढील २५ वर्षे मुंबईत खड्डे दिसणार नाहीत. डांबरात हात काळे करण्याची संधी त्यांना मिळणार नाही. पोपटाचा जीव पिंजर्‍यात असतो, तसा यांचा जीव मुंबईतील रस्त्यांत आहे. मागच्या अनेक वर्षांत डांबराचे सांबार कुणी खाल्ले, हे आता समोर यायला हवे,” असा हल्लाबोल शिंदे यांनी केला.
 
“विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव हा उथळ होता. अनेक विषय रिपीट झालेले आहेत. आता महायुतीची दुसरी इंनिंग सुरू झाली आहे. ‘नो रिझन, ऑन दी स्पॉट डीसिजन’ देणारे आमचे सरकार आहे. ‘रिझन’ देणार्‍यांचा ‘सिझन’ जनतेने संपवून टाकला आहे. महाराष्ट्राला देशात एक नंबर करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. राज्यात पायाभूत सुविधांची दहा लाख कोटी रुपयांची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. नवी मुंबई विमानतळ, वाढवण बंदर विकासाचे काम सुरू आहे. ‘कनेक्टिव्हिटी’वर आम्ही भर दिला आहे. उद्योजक, व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. पर्यटन विकासासाठी प्रयत्न करीत आहोत. मे महिन्यात मोठा पर्यटन महोत्सव महाबळेश्वरमध्ये घेतला जाणार आहे,” असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
 
आरशात पाहून वारसा सांगता येणार नाही
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना देवेंद्र फडणवीस औरंगजेबासारखे वाटले. त्यांना सांगायला हवे, सगळीच वेळ सारखी नसते. ‘मशाल पेटवून, खुशाल झोपा’ काढणार्‍यांना आता शहाणपण आले असेल. गद्दार, गद्दार म्हणून टीका करीत बसलात. आरशात पाहून वारसा सांगता येत नाही, हे लक्षात ठेवा. खोट्या केसेस उभ्या करून देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना अटक करण्याचा प्रयत्न करताना कुठे होते संविधान? नारायण राणे यांना अटक करताना, राणा दाम्पत्याला त्रास देताना संविधान आठवले नाही? वाझे काय लादेन आहे का, असे म्हणताना संविधान आठवले नाही? कंगणा राणावत यांच्या घरावर बुलडोझर चालवताना संविधान आठवले नाही? असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
 
अग्रलेख
जरुर वाचा
प.बंगालमधील मालदानंतर आता मुर्शिदाबादमध्ये वादंग, अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून समज

प.बंगालमधील मालदानंतर आता मुर्शिदाबादमध्ये वादंग, अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून समज

Marshidabad प. बंगालच्या मालदा जिल्ह्यानंतर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदामध्ये एका हिंसेला घेईन पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीआहे. पोलिसांनी एक्स ट्विटर लिहिले की, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदात मोठा उपद्रव झाला. ज्यात हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच काही हिंदूंच्या शेतांचे, पिकांचे नुकसान करण्यात आले आणि तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ६ लोकांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना पोलीस शोधमोहिमेवर आहेत. ..

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकरांनी अनुभवला संस्कृतीचा महाकुंभ स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकरांनी अनुभवला "संस्कृतीचा महाकुंभ" स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह

Hindu New Year ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या...भगवे झेंडे - उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी "संस्कृतीचा महाकुंभ" अनुभवला. यंदा स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. सकाळी ७ वा. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करून प्रारंभ झालेल्या यात्रेत सर्वधर्मियांचा उत्साह दिसून आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार ..

सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्राचे आयोजन

सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्राचे आयोजन

Hindu New Year पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावातील संस्कृती कलादर्पण संस्था आणि समस्त सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९४७,विक्रमसंवत २०८१ रविवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी रोजी हिंदू नव वर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले . संस्कृती कलादर्पण संस्था, सातपाटी वर्षभर गावात अनेक शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असते.जसे ..२६ जानेवारी विद्यार्थी कवायत संचलन - जागर प्रजासत्ताक दिनाचा,तिथीनुसार शिवजन्मोत्सव,हिंदू नववर्ष शोभायात्रा ,हुतात्मा दिन - वक्तृत्व स्पर्धा,दिवाळी ..

लव्ह जिहाद : पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तीन वेळा केले गर्भवती; नंतर उपवास धरणे, गोमांस खाण्यास आणला दबाव

लव्ह जिहाद : पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तीन वेळा केले गर्भवती; नंतर उपवास धरणे, गोमांस खाण्यास आणला दबाव

love jihad उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात लव्ह जिहादची love jihad एक घटना घडली आहे. अहमद रजा नावाच्या कट्टरपंथी युवकाने तिला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तिच्याशी शारीरिक-मानसिक शोषण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. युवतीचे म्हणणे आहे की, अहमदने केवळ युवतीच्या भावनांसोबत खेळ केला नाहीतर, त्याने तिला मुस्लिम उपवास म्हणजेच रोजाचे पालन करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर गोमांस खाणे आणि नमाज पाडण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121