समाजकार्याची ‘जिजाऊ’ प्रेरणा

    27-Mar-2025   
Total Views | 9
adv shubhangi sarang


कौटुंबिक अत्याचाराने पीडित महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत जागृत करण्याचे काम निस्वार्थभावे करणार्‍या अ‍ॅड. शुभांगी संदीप सारंग यांच्याविषयी...

‘समाजाचे आपण देणे लागतो,’ हे बाळकडू लहान वयातच मनात रूजल्याने, आपणही समाजासाठी काहीतरी करावे, अशी भावना अ‍ॅड. शुभांगी संदीप सारंग यांच्या मनात जागृत झाली होती. आपल्या वडिलांकडे पाहून आणि सिंधुताई सपकाळ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, शुभांगीताई समाजातील कौटुंबिक अत्याचाराने पीडित महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत जागृत करण्याचे काम करीत आहेत. त्यांच हे समाजकार्य सुरू आहे, ते त्यांनी उभ्या केलेल्या ‘जिजाऊ वूमेन लिगल फोरम’च्या माध्यमातून.

तसे पाहिले तर शुभांगीताईंचे बालपण धुळे जिल्ह्यात गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण ‘कनोसा कॉन्व्हेन्ट हायस्कूल’मध्ये झाल्याने साहजिकच त्यांच्यावर इंग्रजीचा जास्त प्रभाव होता. घरात मात्र सर्वजण मराठीतच बोलायचे. त्यानंतर ‘शिवाजी विद्या प्रसारक संस्थे’तून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पूर्वी १८ वर्षे पूर्ण झाली की, आईवडील मुलीचे लग्न लावून निर्धास्त होत. त्यानुसार एकीकडे शिक्षण सुरू असतानाच, १९९८ साली आईवडिलांनी त्यांचे लग्न लावून दिले. आईवडील, पाच भावंडे असे त्यांचे कुटुंब. शिक्षणाची आवड असल्याने परिवारात उच्चशिक्षित असलेल्या शुभांगीताई या एकमेव. त्यांचे वडील समाजसेवक होते. त्यामुळे शुभांगीताईंमध्ये समाजकार्याबाबत आधीपासूनच ओढ निर्माण झाली होती. आपणही समाजासाठी काहीतरी करावे, ही भावना त्यांच्या मनात जागृत झाली.
 
लग्न झाल्यानंतर शुभांगीताई मुंबईत आल्या. घरात सासू, नणंद, दीर मुलगा आणि पती असे छोटे कुटुंब होते. शुभांगीताईंना भक्कम पाठिंबा त्यांच्या घरातून होताच. पण, मित्रपरिवाराने, गुरूंनी कायमचा मार्गदर्शन देऊन त्यांना एक दिशा दिली. मगाशी म्हटल्याप्रमाणे, सिंधुताईंनी ज्याप्रमाणे अगदी निस्वार्थपणे मुलांचा सांभाळ केला, त्याप्रमाणे शुभांगीताईंना समाजासाठी काहीतरी करावे असे वाटत होते. कायद्याचा अभ्यास करत असताना एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे, बर्‍याच महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना कायद्याची माहिती नसल्यामुळे त्यांच्यावर मानसिक तसेच शारीरिक अत्याचार होतो आणि त्यावर कायद्यामध्ये काय तरतूद आहे, हे त्यांना ठावूक नसते. त्यामुळे आपण जे शिकलो, त्याचा समाजासाठी उपयोग करू शकतो का, असा विचार शुभांगीताईंच्या डोक्यात आला आणि २०१६ साली ‘जिजाऊ वूमेन लिगल फोरम’ची स्थापना झाली. शुभांगीताईंसह मुंबई उच्च न्यायालयातील आठ महिला वकिलांनी महिलांसाठी तयार केलेली ही संस्था. गुरू रवींद्र संकपाळ आणि संदीप डोळस यांचे आशीर्वाद कायम सोबत असल्याचे त्या आवर्जून अधोरेखित करतात.

आजच्या काळात वकिलांना कुठलीही कागदपत्रे दाखवायची म्हटली, तर ती तपासण्यासाठी विशिष्ट फी आकारली जाते, जी सहसा गोरगरिबांना परवडत नाही. मग अशावेळी त्यांचे काय? त्यांच्यासाठी सुरुवातीला ‘मोफत सल्लामसलत’ संस्थेतर्फे सुरू केली. त्यानंतर पुढे प्रामुख्याने कौटुंबिक अत्याचार आणि ज्येष्ठ नागरिक कायदा हे दोन मुद्दे केंद्रस्थानी आले. कौटुंबिक अत्याचाराने पीडित १,७००-१८०० महिला संस्थेच्या संपर्कात आल्या. असे असले तरी कोर्टाची पायरी चढायची म्हटल्यावर त्यातून बर्‍याचजणी माघारी फिरायच्या. काही महिला तक्रार माघे घ्यायच्या आणि पुन्हा महिनाभराने तिच तक्रार घेऊन परतदेखील यायच्या. अशाने कोर्टात त्यांना न्याय मिळवून देणे कठीण जायचे. समाजातील अशा महिलांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. त्यांची नेमकी चूक कुठे होते, हे या महिलांना समजावून सांगण्याचे काम ही संस्था करते. त्यासोबतच महिलांना त्यांच्या आयुष्यात स्वावलंबी कसे करता येईल, या दृष्टिकोनातून संस्था कृतिशील आहे. ‘जिजाऊ वूमेन लिगल फोरम’च्या माध्यमातून स्वावलंबी झालेल्या आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहिलेल्या महिलांची मुंबईत एकूण ७० ते ८० जणांची टीम तयार झाली आहे, ज्या आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्याही इतक्या सजग आहेत की, कुठे कौटुंबिक अत्याचाराची घटना घडताना जाणवली की, त्या संस्थेपर्यंत त्याची माहिती पोहोचवतात.

ज्येष्ठ नागरिकांबाबत सांगायचे झाल्यास, बर्‍याच ज्येष्ठ नागरिकांना कायद्याने दिलेले हक्क काय आहेत, हे ठावूकच नसते. ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या मुलांचा सांभाळ केला, त्याचप्रमाणे भविष्यात मुले आपला सांभाळ करतील का? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभे असतात. मग अशावेळी ज्येष्ठ नागरिक कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत, त्याबाबत ज्येष्ठ नागरिकांना समजावून सांगण्याचे कार्य ‘जिजाऊ वूमेन लिगल फोरम’च्या माध्यमातून केले जाते. २०० हून अधिक ज्येष्ठ नागरिक या माध्यमातून संस्थेशी जोडले गेले आहेत. शुभांगीताई ‘सहकार भारती’च्या दक्षिण मुंबई महिला अध्यक्ष झाल्यानंतर महिलांचे सहकार क्षेत्रात काय योगदान असू शकते, याबाबत त्यांनी अनेकांना माहिती करून दिली. त्याचबरोबर समाजाला अध्यात्माची गोडी लागावी, म्हणून संस्थेच्यावतीने २०१८ साली ‘महाशिवपुराण’ आयोजित करण्यात आले होते. अनेकांना याचा फायदा असा झाला की, अनेकजण मानसिक तणावातून मुक्त झाले.
 
नुकतेच शुभांगीताईंना ‘जागतिक संस्कृती’ आणि ‘पर्यावरण आयोगा’तर्फे ‘डॉक्टरेट’ ही पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावे असले, तरी गरजूंना मदत करत त्यातून मिळणारे समाधान त्यांच्यासाठी पुरस्कारासमान आहे. अ‍ॅड. शुभांगी सारंग यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने अनेक शुभेच्छा!






 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा
प.बंगालमधील मालदानंतर आता मुर्शिदाबादमध्ये वादंग, अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून समज

प.बंगालमधील मालदानंतर आता मुर्शिदाबादमध्ये वादंग, अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून समज

Marshidabad प. बंगालच्या मालदा जिल्ह्यानंतर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदामध्ये एका हिंसेला घेईन पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीआहे. पोलिसांनी एक्स ट्विटर लिहिले की, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदात मोठा उपद्रव झाला. ज्यात हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच काही हिंदूंच्या शेतांचे, पिकांचे नुकसान करण्यात आले आणि तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ६ लोकांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना पोलीस शोधमोहिमेवर आहेत. ..

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकरांनी अनुभवला संस्कृतीचा महाकुंभ स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकरांनी अनुभवला "संस्कृतीचा महाकुंभ" स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह

Hindu New Year ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या...भगवे झेंडे - उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी "संस्कृतीचा महाकुंभ" अनुभवला. यंदा स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. सकाळी ७ वा. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करून प्रारंभ झालेल्या यात्रेत सर्वधर्मियांचा उत्साह दिसून आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार ..

सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्राचे आयोजन

सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्राचे आयोजन

Hindu New Year पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावातील संस्कृती कलादर्पण संस्था आणि समस्त सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९४७,विक्रमसंवत २०८१ रविवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी रोजी हिंदू नव वर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले . संस्कृती कलादर्पण संस्था, सातपाटी वर्षभर गावात अनेक शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असते.जसे ..२६ जानेवारी विद्यार्थी कवायत संचलन - जागर प्रजासत्ताक दिनाचा,तिथीनुसार शिवजन्मोत्सव,हिंदू नववर्ष शोभायात्रा ,हुतात्मा दिन - वक्तृत्व स्पर्धा,दिवाळी ..

लव्ह जिहाद : पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तीन वेळा केले गर्भवती; नंतर उपवास धरणे, गोमांस खाण्यास आणला दबाव

लव्ह जिहाद : पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तीन वेळा केले गर्भवती; नंतर उपवास धरणे, गोमांस खाण्यास आणला दबाव

love jihad उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात लव्ह जिहादची love jihad एक घटना घडली आहे. अहमद रजा नावाच्या कट्टरपंथी युवकाने तिला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तिच्याशी शारीरिक-मानसिक शोषण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. युवतीचे म्हणणे आहे की, अहमदने केवळ युवतीच्या भावनांसोबत खेळ केला नाहीतर, त्याने तिला मुस्लिम उपवास म्हणजेच रोजाचे पालन करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर गोमांस खाणे आणि नमाज पाडण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121