दिशा सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंनी बोलणं टाळलं! म्हणाले, "त्या विषयावर..."

    27-Mar-2025
Total Views | 41
 
Uddhav Thackeray Disha Salian
 
मुंबई : (Uddhav Thackeray) राज्यभरात सध्या दिशा सालियान मृत्यू प्रकरण चर्चेत असून यात उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंचे नाव पुढे आले आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे सांगत यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
 
दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी दिशा सालियानची हत्या झाल्याचा आरोप करत न्यायालयात या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिशाचा मृत्यू आत्महत्या नसून तिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप सतीश सालियान यांनी केला आहे. तसेच तत्कालिन उद्धव ठाकरे सरकारने हे प्रकरण दाबले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
हे वाचलंत का? - होय, आम्हीच संतोष देशमुखांचे मारेकरी! सुदर्शन घुलेसह आरोपींची मोठी कबुली; नेमकं काय म्हणाले?
 
गुरुवार, २७ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना दिशा सालियान प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, "दिशा सालियानप्रकरणाशी माझा संबंध नाही. या विषयाबद्दल माझ्याकडे काहीही माहिती नाही. त्यामुळे त्या विषयावर मी बोलत नाही," असे म्हणत त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ईदच्या मुहूर्तावर सलमान नाराज; सिकंदर बॉक्स ऑफिसवर प्रभाव पाडण्यात अपयशी!

ईदच्या मुहूर्तावर सलमान नाराज; सिकंदर बॉक्स ऑफिसवर प्रभाव पाडण्यात अपयशी!

सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सिकंदर चित्रपटाने ३० मार्चपासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सुरुवात केली. ए. आर. मुरुगादॉस दिग्दर्शित या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी चित्रपटाचे कौतुक केले असले तरी काहींनी त्यावर टीका केली आहे. सलमान आणि रश्मिकाच्या अभिनयासह चित्रपटाच्या कथानकावरही काही प्रेक्षक नाराज असल्याचे दिसते. मात्र, तरीही पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे? जाणून घेऊया...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121