महाराष्ट्राला ‘ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग नॅशनल कॅपिटल’ बनवणार!

    27-Mar-2025
Total Views | 8
 
Maharashtra will be EV Manufacturing National Capital Devendra Fadanvis
 
मुंबई: ( Maharashtra will be EV Manufacturing National Capital Devendra Fadanvis ) “डिझेल आणि पेट्रोलवरील वाहनांमुळे होणार्‍या प्रदूषणाचे प्रमाण महाराष्ट्रात अधिक आहे. त्यामुळे खासगी आणि सार्वजनिक वाहतूक ‘ईव्ही’वर आणण्याबाबत ठोस नियोजन केले जात आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ईव्ही’ उत्पादनाचे अतिविशाल प्रकल्प सुरू होत आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र ‘ईव्ही मॅन्युफॅक्चरिंगचे नॅशनल कॅपिटल’ म्हणून नावारुपास येईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २६ मार्च रोजी विधान परिषदेत व्यक्त केला.
 
आ. उमा खापरे यांनी पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील प्रदूषणाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, अनिल परब, अमित गोरखे, मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की, “एसटी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने अपारंपरिक इंधनावर परावर्तीत करण्यात येणार आहेत. ‘एसटी’च्या बसेस इलेक्ट्रिक आणि ‘एलएनजी’ इंधनावर सुरू करण्याचे नियोजन आहे. ‘एसटी’ महामंडळाकरिता ५ हजार, १५० इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्यात येणार आहेत. त्यांपैकी ४५० बसेस खरेदी केल्या आहेत. तसेच ‘एसटी’च्या सध्याच्या बसेस ‘एलएनजी’मध्ये परावर्तीत करण्यात येणार असून ‘एलएनजी’ पुरवठा करण्यासाठी करार करण्यात आला आहे.”
 
“राज्यात ‘ईव्ही’च्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘ईव्ही’ धोरण आणले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात ३० लाखांपेक्षा जास्त किमतीच्या ‘ईव्ही’ वाहनांवर सहा टक्के कर आकारण्याचे जाहीर केले आहे. परंतु, हा कर मागे घेण्याची घोषणा सभागृहात करण्यात येणार आहे. राज्यातील रस्त्यावर धावणार्‍या वाहनांपैकी किमान ८० टक्के ‘ईव्ही’ वाहने होतील, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ‘ईव्ही’ वाहनांचा वापर वाढला की प्रदूषण कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल. तसेच हिंजवडी परिसरातील होणारे प्रदूषण हे मुख्यतः वाहनांमुळे होत असून यासाठी मेट्रो आणि बसेसची कनेक्टिव्हीटी सुरू करण्यात येत आहे. जास्तीत जास्त ईव्ही’ बसेस घेण्याचा प्रयत्न असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही प्रदूषणमुक्त असावी, असे शासनाचे धोरण आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

मंत्री, आमदारांनाही ‘ईव्ही’ गाड्या
 
“सर्व शासकीय वाहनेही इलेक्ट्रिक करण्याचे शासनाचे धोरण आहे. आमदारांनाही देण्यात येणार्‍या वाहनकर्जावरील व्याज सवलतीही ‘ईव्ही’साठीच देण्यात येतील. सर्व मंत्री यांची वाहनेही ‘ईव्ही’मध्ये बदलण्याचे शासनाचे नियोजन आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली.
 
महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल
 
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी १२ कायदे मंजूर केले. माथाडी कायद्यात सकारात्मक सुधारणा केल्यामुळे, यातील धमकावण्याचे प्रकार आणि गोरखधंदे कमी होतील. अजित पवार यांनी पंचसूत्रावर आधारित अर्थसंकल्प मांडला. विरोधी पक्ष संख्येने कमी असला, तरी त्यांना पूर्ण वाव दिला. महाराष्ट्राच्या विकासासाठी धोरणात्मक अर्थसंकल्प मंजूर केल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल. भास्कर जाधव यांनी माझी प्रशंसा केली, त्याबद्दल त्यांचे आभार. विरोधी पक्षनेता ठरवण्याचा अधिकार माझा नाही, विधानसभा अध्यक्षांचा आहे.
 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
आश्वासन पाळणार
 
सगळ्या योजना बंद करणार, विकास प्रकल्प बंद करणार, अशी टीका विरोधक करीत होते. परंतु, लोककल्याणकारी योजना कायम सुरू ठेवताना अर्थव्यवस्थेची घडी विस्कटू दिली नाही. महायुती सरकारची नवी इनिंग धडाक्यात सुरू झाली आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी मानून आम्ही मागच्या टर्ममध्ये काम केले, यापुढेही सुरू आहे. हे आमचे टीमवर्क आहे, ते उत्तमपणे सुरू आहे. विकासाचा वेग कमी न करता, काम सुरू आहे. आम्ही कुठलेही आश्वासन टाळणार नाही, तर पाळणार!
 
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
अग्रलेख
जरुर वाचा
प.बंगालमधील मालदानंतर आता मुर्शिदाबादमध्ये वादंग, अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून समज

प.बंगालमधील मालदानंतर आता मुर्शिदाबादमध्ये वादंग, अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून समज

Marshidabad प. बंगालच्या मालदा जिल्ह्यानंतर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदामध्ये एका हिंसेला घेईन पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीआहे. पोलिसांनी एक्स ट्विटर लिहिले की, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदात मोठा उपद्रव झाला. ज्यात हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच काही हिंदूंच्या शेतांचे, पिकांचे नुकसान करण्यात आले आणि तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ६ लोकांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना पोलीस शोधमोहिमेवर आहेत. ..

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकरांनी अनुभवला संस्कृतीचा महाकुंभ स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकरांनी अनुभवला "संस्कृतीचा महाकुंभ" स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह

Hindu New Year ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या...भगवे झेंडे - उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी "संस्कृतीचा महाकुंभ" अनुभवला. यंदा स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. सकाळी ७ वा. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करून प्रारंभ झालेल्या यात्रेत सर्वधर्मियांचा उत्साह दिसून आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार ..

सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्राचे आयोजन

सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्राचे आयोजन

Hindu New Year पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावातील संस्कृती कलादर्पण संस्था आणि समस्त सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९४७,विक्रमसंवत २०८१ रविवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी रोजी हिंदू नव वर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले . संस्कृती कलादर्पण संस्था, सातपाटी वर्षभर गावात अनेक शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असते.जसे ..२६ जानेवारी विद्यार्थी कवायत संचलन - जागर प्रजासत्ताक दिनाचा,तिथीनुसार शिवजन्मोत्सव,हिंदू नववर्ष शोभायात्रा ,हुतात्मा दिन - वक्तृत्व स्पर्धा,दिवाळी ..

लव्ह जिहाद : पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तीन वेळा केले गर्भवती; नंतर उपवास धरणे, गोमांस खाण्यास आणला दबाव

लव्ह जिहाद : पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तीन वेळा केले गर्भवती; नंतर उपवास धरणे, गोमांस खाण्यास आणला दबाव

love jihad उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात लव्ह जिहादची love jihad एक घटना घडली आहे. अहमद रजा नावाच्या कट्टरपंथी युवकाने तिला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तिच्याशी शारीरिक-मानसिक शोषण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. युवतीचे म्हणणे आहे की, अहमदने केवळ युवतीच्या भावनांसोबत खेळ केला नाहीतर, त्याने तिला मुस्लिम उपवास म्हणजेच रोजाचे पालन करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर गोमांस खाणे आणि नमाज पाडण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121