काँग्रेसने बाबासाहेबांचे संविधान गोठवले!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘मिसा’ कायद्याने सर्वसामान्यांचे अधिकार हिसकावले

    27-Mar-2025
Total Views | 5
 
Devendra Fadanvis
मुंबई: ( Devendra Fadanvis on Congress babasaheb ambedkar constitution ) “संविधान बचाव’च्या घोषणा देणार्‍यांच्या काँग्रेस पक्षाने आणीबाणी लादून भारतीयांचे मूलभूत अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य काढून घेतले. राज्य कायद्याने नव्हे, तर हुकमाने चालेल, अशी व्यवस्था तयार करण्यात आली. विरोधी पक्षातील एक लाखाहून अधिक नेत्यांना तुरुंगात टाकले. माझे वडील दोन वर्षे तुरुंगात होते, काकू शोभा फडणवीस तुरुंगात होत्या. त्यांचा गुन्हा काय, हे सांगायला सरकार तयार नव्हते. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान गोठवून विरोधी पक्षच तुरुंगात पाठवला,” असा हल्लाबोल ‘आणीबाणी योग्य नाही,’ असे किशोर कुमारांनी म्हटले, म्हणून आकाशवाणीवर त्यांची गाणी वाजवणे बंद केले. जॉर्ज फर्नांडिस यांच्या कुटुंबासोबत जे काही झाले, ते आठवले, तरी माझ्या डोळ्यांत पाणी आणि अंगावर काटे उभे राहतात,” असे फडणवीस म्हणाले.
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “इतके करूनही ते थांबले नाहीत. भारतीय संविधानात काँग्रेसने 99 बदल केले. त्यात सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे देशाचे पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष हे न्यायालयाच्या कक्षेत येणार नाहीत, असा कायदा त्यांनी केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा गांधींविरोधात दिलेला निकाल निरस्त करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिले, तेव्हा भारत सार्वभौम लोकतांत्रिक गणराज्य होते. परंतु, आणीबाणीच्या काळात त्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे शब्द इंदिरा गांधींनी टाकले. हे शब्द मूळ संविधानात नाहीत. या देशाचा मूळ आत्माच धर्मनिरपेक्ष आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होते,” असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
 
मुख्यमंत्र्यांचे संविधानावरील भाषण पुस्तक स्वरूपात प्रकाशित करावे!
 
संविधानावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ लेखक तथा विचारवंत ‘पद्मश्री’ रमेश पतंगे यांच्या ‘संविधान’ या विषयावरील सर्व प्रकाशित पुस्तकांचा संदर्भ साहित्य म्हणून उपयोग केला. देवेंद्र फडणवीस यांचे हे भाषण इतके दर्जेदार होते की, उबाठा गटाचे आ. भास्कर जाधव यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले. तसेच मुख्यमंत्र्यांचे संविधानावरील भाषण पुस्तकस्वरूपात प्रकाशित करावे, अशी विनंती त्यांनी विधानसभा अध्यक्षांना केली. त्यावर, जाधव यांच्या सूचनेचा सकारात्मक विचार केला जाईल, अशी ग्वाही अध्यक्षांनी दिली.
 
राज्यांचे अधिकार केंद्राला दिले
 
“बाबासाहेबांनी राज्यांना दिलेले अधिकार केंद्राकडे देण्याचे काम 42व्या घटना दुरुस्तीने केले. 42व्या घटना दुरुस्तीनंतर राष्ट्रपती केवळ बाहुले होते. त्यांच्याकडे निर्णय पाठवला, तर सही करावीच लागायची, अशी घटना दुरुस्ती काँग्रेसने केली होती. केंद्रीय पोलीस, तपास यंत्रणा कुठल्याही राज्यात हस्तक्षेप करू शकतात, अशी दुरुस्ती कायद्यात केली. परंतु, आज ते असे करू शकत नाहीत. राज्याने परवानगी दिल्याशिवाय केंद्राच्या पोलीस दलाला राज्यात प्रवेश मिळत नाही. राष्ट्रपती, राज्यपालांना अधिकार देण्यात आले आहेत. एखादा निर्णय ते रद्दबातल करू शकतात,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
संविधानिक संस्थांना बदनाम करण्याचे प्रयत्न
 
“विरोधकांना सत्तेत येता येत नाही, म्हणून ते देशातील संस्थांना बदनाम करीत आहेत. देशाच्या सर्व संस्थांना कलंकित करायचे, त्यांच्यावर बोटे उचलायची, त्या संस्थांना एकप्रकारे अराजकाकडे न्यायचे, असे प्रकार सुरू आहेत. परंतु, या संस्थांना जेव्हा आपण बदनाम करतो, तेव्हा संविधानावर अविश्वास दाखवतो. कारण या संस्था संविधानाने निर्माण केल्या आहेत. या संस्था इतक्या भक्कम करण्यात आल्या आहेत की, त्या कोणी तोडू शकणार नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
प.बंगालमधील मालदानंतर आता मुर्शिदाबादमध्ये वादंग, अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून समज

प.बंगालमधील मालदानंतर आता मुर्शिदाबादमध्ये वादंग, अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून समज

Marshidabad प. बंगालच्या मालदा जिल्ह्यानंतर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदामध्ये एका हिंसेला घेईन पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीआहे. पोलिसांनी एक्स ट्विटर लिहिले की, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदात मोठा उपद्रव झाला. ज्यात हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच काही हिंदूंच्या शेतांचे, पिकांचे नुकसान करण्यात आले आणि तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ६ लोकांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना पोलीस शोधमोहिमेवर आहेत. ..

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकरांनी अनुभवला संस्कृतीचा महाकुंभ स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकरांनी अनुभवला "संस्कृतीचा महाकुंभ" स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह

Hindu New Year ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या...भगवे झेंडे - उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी "संस्कृतीचा महाकुंभ" अनुभवला. यंदा स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. सकाळी ७ वा. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करून प्रारंभ झालेल्या यात्रेत सर्वधर्मियांचा उत्साह दिसून आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार ..

सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्राचे आयोजन

सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्राचे आयोजन

Hindu New Year पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावातील संस्कृती कलादर्पण संस्था आणि समस्त सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९४७,विक्रमसंवत २०८१ रविवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी रोजी हिंदू नव वर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले . संस्कृती कलादर्पण संस्था, सातपाटी वर्षभर गावात अनेक शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असते.जसे ..२६ जानेवारी विद्यार्थी कवायत संचलन - जागर प्रजासत्ताक दिनाचा,तिथीनुसार शिवजन्मोत्सव,हिंदू नववर्ष शोभायात्रा ,हुतात्मा दिन - वक्तृत्व स्पर्धा,दिवाळी ..

लव्ह जिहाद : पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तीन वेळा केले गर्भवती; नंतर उपवास धरणे, गोमांस खाण्यास आणला दबाव

लव्ह जिहाद : पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तीन वेळा केले गर्भवती; नंतर उपवास धरणे, गोमांस खाण्यास आणला दबाव

love jihad उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात लव्ह जिहादची love jihad एक घटना घडली आहे. अहमद रजा नावाच्या कट्टरपंथी युवकाने तिला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तिच्याशी शारीरिक-मानसिक शोषण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. युवतीचे म्हणणे आहे की, अहमदने केवळ युवतीच्या भावनांसोबत खेळ केला नाहीतर, त्याने तिला मुस्लिम उपवास म्हणजेच रोजाचे पालन करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर गोमांस खाणे आणि नमाज पाडण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121