चांदोलीतील खुंदलापूर धनगरवाड्याचे पुनर्वसन २८ वर्षांपासून रखडलेले - वनमंत्री संतापले

    20-Mar-2025   
Total Views | 18
kundalpur relocation issue


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील खुंदलापूर धनगरवाड्याच्या पुनर्वसनासंदर्भात गुरुवार दि. २० मार्च रोजी वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत माहिती दिली (kundalpur relocation issue). हे गाव व्याघ्र प्रकल्पामधून वगळण्यासाठी पुढील एक महिन्याच्या आत राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी घेऊन त्यासंदर्भातील प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठवला जाईल, अशी खात्री त्यांनी दिली (kundalpur relocation issue). तसेच हा प्रश्न गेल्या २८ वर्षांपासून रखडवल्यामुळे त्यांनी वन अधिकाऱ्यांवर ताशेरे देखील ओढले. (kundalpur relocation issue)



शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख यांनी चांदोली राष्ट्रीय उद्यानातील खुंदलापूर धनगरवाड्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनात मांडला होता. सह्याद्री व्याघ प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात असल्यामुळे खुंदलापूर धनगरवाडा येथील ग्रामस्थांना गेली २५ वर्ष शासनाच्या विविध योजनांपासून वंचित रहावे लागत असून अनेक महत्त्वाच्या सुविधांपासून देखील हे ग्रामस्थ वंचित असण्यावर, देशमुख यांनी लक्ष वेधले होते. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वनमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी महत्वपूर्ण बैठक लावली. या बैठकीत चर्चा केल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी यासंदर्भात विधानसभेत उत्तर दिले.
 
 
नाईक म्हणाले की, "सत्यजित देशमुख यांनी खुंदलापूर धनगरवाड्याच्या संदर्भात मांडलेल्या भूमिकेशी मी अंशत: सहमत आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार १९८५ साली चांदोली अभयारण्याची घोषणा झाली. दुसऱ्या टप्पात हे अभायरण्य राष्ट्रीय उद्यान म्हणून रुपांतर करण्यात आले आणि तिसऱ्या टप्प्यात हा भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला. १९८५ ते २०२५ म्हणजेच साधारण २८ वर्ष या येथील घटकांना काही गोष्टींपासून वंचित रहावे लागले, या देशमुखांच्या आरोपांशी मी सहमत आहे. यात दप्तरदिरंगाई झाली आणि या लोकांना दुर्लक्षित करण्यात आले. या बाबतीत व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा बदलाचे अधिकार हे केंद्र शासनाला आहेत. त्यानुसार हे गाव व्याघ्र प्रकल्पामधून वगळण्याबाबत एका महिन्याच्या आत राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी घेऊन प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठविण्यात येईल. याचा पाठपुरावा मी स्वत: करेन. तसेच येथील शेतकऱ्यांना आणि गुराढोरांना कुठल्याही प्रकारे वन खात्याच्या अधिकाऱ्याकडून अमानवी वागणूक मिळणार नाही, याची मी खात्री देतो."

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
सचिन-सचिन हुशार दिग्दर्शकांची जोडी येणार एकत्र; गुलकंद १ मे ला जवळच्या चित्रपटगृहात!

सचिन-सचिन हुशार दिग्दर्शकांची जोडी येणार एकत्र; गुलकंद १ मे ला जवळच्या चित्रपटगृहात!

मुंबई : दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटे या जोडीने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरजंन केले आहे. वेगवेगळ्या शोज, मालिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना हसण्यास भाग पाडले. मात्र आता ही जोडी एक वेगळा जॉनर घेऊन मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित 'गुलकंद' चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या जोडगोळीची अनोखी जादू प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौघुले, ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका ..

बांगलादेशात शेख हसीनांच्या समर्थकांवर धर्मांधांकडून हल्ला, ३ निष्पाप सदस्यांना अटक

बांगलादेशात शेख हसीनांच्या समर्थकांवर धर्मांधांकडून हल्ला, ३ निष्पाप सदस्यांना अटक

Bangladesh अवामी लीगच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून पायउतार राहण्यास भाग पाडले. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. त्यानंतर अवामी लीगचे मतदार, पक्षाचे सदस्य आणि अल्पसंख्यांक हिंदूंवर अन्याय अत्याचार करण्यात आला आहे, आजही त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत. अशातच शुक्रवारी २१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी अवामी लीगशी संबंधित असलेल्या लोकांनी ढाक्यातील धनमोंडी परिसरात एका रस्त्यावर मोर्चा काढला. ज्यात पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आले आणि ..