फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल! सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; तपासात खळबळजनक माहिती

    20-Mar-2025
Total Views | 33
 
Faheem Khan
 
नागपूर : नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपासातून अनेक खळबळजनक माहिती उघड झाली आहे. फहीम खाननेच जमाव जमवून त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 
फहीम खानच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट मिळाल्या असून त्यामुळेच हिंसाचार उसळला. फहीम खानसह ६ आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यात आणखी काही आरोपींची नावे पुढे येऊ शकतात. अशा आक्षेपार्ह पोस्ट आढळलेले अकाऊंट्स ब्लॉक करण्याचे काम सुरु आहे.
 
हे वाचलंत का? -  नागपूर हिंसाचार प्रकरणात धक्कादायक माहिती उघड! दंगलीतील आरोपी नागपूरच्या बाहेरचे; काय आहे कनेक्शन?
 
सोमवार, १७ मार्च रोजी रात्री नागपूरमधील काही भागात हिंसाचाराची घटना घडली. या घटनेनंतर नागपूरात सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत या प्रकरणातील ४६ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, फहीम खान हा या हिंसाचाराचा मास्टरमाईंड असल्याचे उघड झाले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सचिन-सचिन हुशार दिग्दर्शकांची जोडी येणार एकत्र; गुलकंद १ मे ला जवळच्या चित्रपटगृहात!

सचिन-सचिन हुशार दिग्दर्शकांची जोडी येणार एकत्र; गुलकंद १ मे ला जवळच्या चित्रपटगृहात!

मुंबई : दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटे या जोडीने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरजंन केले आहे. वेगवेगळ्या शोज, मालिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना हसण्यास भाग पाडले. मात्र आता ही जोडी एक वेगळा जॉनर घेऊन मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित 'गुलकंद' चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या जोडगोळीची अनोखी जादू प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौघुले, ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका ..

बांगलादेशात शेख हसीनांच्या समर्थकांवर धर्मांधांकडून हल्ला, ३ निष्पाप सदस्यांना अटक

बांगलादेशात शेख हसीनांच्या समर्थकांवर धर्मांधांकडून हल्ला, ३ निष्पाप सदस्यांना अटक

Bangladesh अवामी लीगच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून पायउतार राहण्यास भाग पाडले. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. त्यानंतर अवामी लीगचे मतदार, पक्षाचे सदस्य आणि अल्पसंख्यांक हिंदूंवर अन्याय अत्याचार करण्यात आला आहे, आजही त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत. अशातच शुक्रवारी २१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी अवामी लीगशी संबंधित असलेल्या लोकांनी ढाक्यातील धनमोंडी परिसरात एका रस्त्यावर मोर्चा काढला. ज्यात पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आले आणि ..