‘ती’ वादग्रस्त इफ्तार पार्टी अखेर रद्द

नेरूळ पोलीस ठाण्यातील वादग्रस्त इफ्तार पार्टी रद्द

    19-Mar-2025
Total Views | 26

Nerul Police station orgnized iftar party has been cancelled

 
मुंबई (सागर देवरे): ‘नेरूळ पोलीस ठाणे’ आणि ’मरकज-ए-फलाह’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 मार्च रोजी नेरुळ पूर्वमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे कार्यक्रम पत्रिका स्वरूपातील हे पत्र ’मरकज-ए-फलाह’ या धार्मिक संघटनेच्या नाव आणि नेरुळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अधिकृत सही आणि लोगोसहित सोशल मीडियावर व्हायरल झाले. या कार्यक्रमाला वाढता विरोध आणि राज्यातील तापलेले वातावरण पाहता, कायदा-सुव्यवस्थेच्या कारणाने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे पत्रक पुन्हा एकदा आयोजक आणि नेरुळ पोलीस ठाण्याद्वारे जारी केले आहे.
 
फ्रुटवाला कल्चर सेंटर, सेक्टर-5, नेरुळ पूर्व येथे ’मरकज-ए-फलाह’ ही इस्लामिक संघटना आणि नेरूळ पोलीस स्टेशनच्यावतीने आयोजक म्हणून निमंत्रण पत्रिका तयार केली होती. या निमंत्रण पत्रिकेत नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवाडी यांच्या सहीनिशी महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत चिन्ह असलेला लोगोही वापरण्यात आला होता. महाराष्ट्र पोलीस यंत्रणा ही राष्ट्रीय सुरक्षा दृष्टिकोनातून कार्यरत एक महत्त्वाची शासकीय संस्था आहे. या संस्थेने भारतीय संविधानानुसार धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचे पालन करणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत चिन्ह हे केवळ सरकारी दस्तऐवज, पत्रव्यवहार, आदेश आणि विशिष्ट अधिकृत वापरासाठीच राखून ठेवण्यात आलेले असते. असे असताना आणि महाराष्ट्रातील वातावरण धार्मिक दंगलीमुळे तापलेले असताना कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असणार्‍या पोलीस ठाण्यानेच अशा कार्यक्रमाचे सयुक्तरित्या आयोजन केल्याने याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
 
‘विश्व हिंदू परिषद’-नवी मुंबईचे पत्र
 
पत्र समाजमाध्यमांवर पसरताच, नवी मुंबई येथील ‘विश्व हिंदू परिषदे’च्या कार्यकर्त्यांनी नेरुळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. यावेळी, त्यांनी सोमवार, दि. 17 मार्च रोजी नागपूर येथे झालेल्या अनुचित घटनेचा आणि पोलिसांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या पाश्वर्र्भूमीवर या कार्यक्रमाला तीव्र शब्दांत विरोध केला. याबाबतचे पत्र ‘विश्व हिंदू परिषद’-नवी मुंबईवतीने नेरुळ पोलिसांना देण्यात आले. याची दखल घेत ही वादग्रस्त इफ्तार पार्टी रद्द करण्यात आली.
 
वरिष्ठ पोलिसांनी उत्तर देणे टाळले
 
या संपूर्ण घटनेची माहिती घेण्याकरता दै. ’मुंबई तरुण भारत’ने नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवाडी यांना संपर्क साधला. मात्र, त्यांनी याबाबत बोलणे टाळले. त्यानंतर वारंवार संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
 
अशा कार्यक्रमाचे आयोजन आवश्यक होते का?
 
नागपूर येथे झालेल्या अनुचित घटनेत चार पोलीस उपायुक्त, अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यावर सशस्त्र हल्ले झाले. जिहाद्यांच्या या प्रचंड हैदोसानंतर अशाप्रकारे दुसर्‍याच दिवशी नेरुळ पोलीस ठाण्याकडून इफ्तार पार्टीच्या आयोजनास हिंदू समाजाचा तीव्र विरोध आहे. मुळात सध्याची परिस्थिती पाहता, अशा कार्यक्रमाचे आयोजन होणे आवश्यक होते का, हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
 
- स्वरूप पाटील, जिल्हामंत्री, विश्व हिंदू परिषद, नवी मुंबई
 
 
नेरुळ पोलीस ठाण्याकडून कायद्याचे उल्लंघन
 
या पत्रकामध्ये पोलीस सहभागातून इफ्तार पार्टीचे आयोजन केलेले आहे. पत्रकात वापरण्यात आलेले ‘लोगो’ ही ’प्रतीकं आणि नावं (अयोग्य वापर प्रतिबंधक) कायदा 1950’ ‘कलम 3’ नुसार बेकायदेशीर आहे. तसेच, ‘कलम 5’अनुसार शिक्षेसही पात्र आहे. पोलीस यंत्रणेच्या या कृतीमुळे ही यंत्रणा एका विशिष्ट धर्माच्या बाजूने कल असणारी आहे, अशी शंका सामान्य माणसाच्या मनात उपस्थित होऊ शकते. धर्मपालन हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग असला, तरी एखाद्या व्यक्तीला किंवा धार्मिक संघटनांना पोलीस यंत्रणेचे चिन्ह वापरायची परवानगी नाही. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी त्वरित लक्ष द्यावे आणि उचित कार्यवाही करावी.
 
- अ‍ॅड. आकाश जगताप, अधिवक्ता, सामाजिक कार्यकर्ते मुंबई
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...