तिबेटचा सांस्कृतिक वंशविच्छेद

    19-Mar-2025
Total Views | 8

how china is weaponizing education to erase tibetan identity & culture
 
कर्ज देऊन, पायाभूत सोयीसुविधांच्या प्रकल्पांची आमिषे दाखवून जगभरातील छोट्या, कमकुवत देशांच्या अंतर्गत राजकारणात शिरकाव करणे, ही चीनची तशी जुनीच खोड. १९५० साली तिबेट गिळंकृत केल्यापासूनच तेथील पिढीला तिबेटी संस्कृतीपासून दूर ठेवण्याकरिता ‘नॅरेटिव्ह कंट्रोल’ करण्याचे प्रयत्न चीनकडून सुरुच आहेत. आता तिथे अभ्यासक्रमाची पुस्तके बदलण्यासह इतर अनेकविध पद्धती चीन अवलंबत आहे. फेब्रुवारीमध्ये जिनिव्हा शिखर परिषदेदरम्यान, नामकी या तिबेटी कार्यकर्त्याने आरोप केल्यानंतर या गोष्टी उघडकीस आल्या. तिबेटच्या भावी पिढ्यांनी चीनचा, तसेच चिनी संस्कृतीचाच सहज स्वीकार करावा, यासाठी तेथील कम्युनिस्ट सरकार अभ्यासक्रमाच्या पुस्तकांसह तिबेटी मुलांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल करुन, त्यांचे ‘ब्रेनवॉशिंग’ सुरु आहे.
 
‘द डिप्लोमॅट’चा अहवाल सांगतो की, तिबेटी मुलांना जबरदस्तीने सरकारी निवासी शाळांमध्ये पाठवले जाते, जिथे विद्यार्थी त्यांच्या पालकांपासून दूर राहतात आणि शाळा त्यांना जेवढे शिकवेल तेवढेच ही मुलं शिकतात. या बोर्डिंग शाळांमध्ये दोन भाषा शिकविल्या जातात, असा चीनचा दावा असला, तरी शाळांमध्ये तिबेटी भाषेऐवजी मँडरीन भाषेतच शिक्षण दिले जाते. चिनी प्रशासनाने तिबेटमध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू केले, तेव्हापासून हा प्रकार घडतो आहे. चीनवर अशाप्रकारे आपल्या संस्कृतीचा ‘नॅरेटिव्ह कंट्रोल’ करण्याचा हा आरोप नवीन नाहीच. २०२४ सालीसुद्धा चीन तिबेटमध्ये ‘भाषिक दहशतवाद’ पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला होता. एवढेच नाही तर चीनने तिबेटमधील चार वर्षांच्या मुलांसाठी बोर्डिंग स्कूलचा विस्तारदेखील केला आहे. या शाळांमध्ये शिकवणीची भाषा म्हणून, तिबेटी ऐवजी चीनच्या मँडरीन भाषेचा शिरकाव झालेला दिसतो. चीनचे म्हणणे आहे की, देशातील बोलली जाणारी प्रमुख भाषा ही मँडरीन आहे आणि या सुधारणांमुळे तिबेटी मुलांना भविष्यात त्याचा फायदा होईल.
 
पण, तिबेटी भाषेचे अभ्यासक चीनच्या या दाव्याशी अजिबात सहमत नाहीत. समाजातील लहान मुलांना लक्ष्य करून तिबेटची ओळख कमकुवत करणे, हेच चीनचे कुटिल उद्दिष्ट आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे. तिबेटींची सामाजिक क्षमता कमी करण्यासाठी चीन शिक्षणास्त्राचा पद्धतशीर वापर करीत आहे. एका अंदाजानुसार, ८० टक्के तिबेटी मुले म्हणजेच साधारण दहा लाख विद्यार्थ्यांना अगदी लहान वयापासून बोर्डिंग स्कूलमध्ये चिनी संस्कृतीचे धडे शिकवले जातात. संयुक्त राष्ट्रांचे तज्ज्ञ आणि तिबेटी कार्यकर्त्यांनीसुद्धा चीनच्या या सांस्कृतिक आणि शैक्षणिक दहशतवादाबाबत अनेकदा आरोप केले आहेत. पण, उपयोग शून्य!
 
तिबेटवर आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी चीनने तिबेटमध्ये अशा बोर्डिंग शाळा आणि वसतिगृहे मोठ्या प्रमाणात बांधली आहेत, ज्यामध्ये मोफत प्रवेश उपलब्ध आहे. शी जिनपिंग यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये तिबेटमधील अशाच एका शाळेला भेटसुद्धा दिली होती. त्यानंतर चीनची ही मोहीम अधिक तीव्र होत गेली. अशा बोर्डिंग शाळांमध्ये नेमकी किती तिबेटी मुले शिक्षण घेत आहेत, याचा खुलासा चीन सरकारने कधीही केला नाही. मात्र, ‘तिबेट अ‍ॅक्शन इन्स्टिट्यूट’च्या अंदाजानुसार, सहा ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे आठ लाख तिबेटी मुले या शाळांमध्ये आहेत. म्हणजेच, प्रत्येकी चारपैकी तीन मुले तिबेटी आहेत, असे म्हणण्यास हरकत नाही. ‘तिबेट अ‍ॅक्शन इन्स्टिट्यूट’ने या प्रकाराला तिबेटी संस्कृतीच्या विनाशाचा प्रयत्न असेच म्हटले आहे. तसेच मुलांचे त्यांच्या मूळ संस्कृतीपासून दूर राहणे, धोकादायक असल्याचेही संस्थेचे म्हणणे रास्त आहे.
 
केवळ चीनच नाही, तर मधल्या काळात अमेरिकेतील शाळांमध्ये शीतयुद्धाच्या काळात साम्यवाद आणि सोव्हिएत युनियनची प्रतिमा पूर्णपणे डागाळलेली दाखवली होती. ब्रिटिश शाळांमध्ये वसाहतवादी राजवटीचे वाईट पैलू लपवत जगासमोर सभ्यता आणणारे असे त्यांचे वर्णन केले होते. चिनी पुस्तकांमध्ये तियानमेन स्क्वेअर हत्याकांडाचा उल्लेखच नाही. अगदी उघूर मुस्लिमांच्या दडपशाहीचे वर्णन ‘दहशतवादाला चिरडण्याची मोहीम’ असे करण्यात आले. त्यामुळे संस्कृतीचा आधार घेत, आपला अजेंडा भावी पिढींवर रेटून चीनधार्जिण्या समाजाची निर्मिती करणे उचित नाही. पण, बेलगाम चिनी ड्रॅगनला लगाम कसणार कोण, हाच खरा प्रश्न. त्यामुळे तिबेटला चीनच्या सत्तापाशांपासून मुक्त करायचे असेल, तर तिबेटी चळवळीचा आवाज आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर बुलंद करणे हे क्रमप्राप्त!
अग्रलेख
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...