संघ शताब्दीनिमित्त सामाजिक सहभाग वाढविण्यावर विचारमंथन

बंगळुरू येथे २१ मार्चपासून अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात

    19-Mar-2025   
Total Views | 12

RSS AB Pratinidhi Sabha Press Conference

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS ABPS 2025)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बंगळुरू येथे होत आहे. चन्नेनहल्ली येथील जनसेवा विद्या केंद्राच्या प्रांगणात २१ ते २३ मार्च या कालावधीत ही तीन दिवसीय बैठक होणार आहे. या बैठकीत संघ शताब्दी वर्षात समाजाचा सहभाग कसा वाढवता येईल, यावर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले. बुधवार, दि. १९ मार्च रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सदर बैठकीला २१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता सुरुवात होईल. यावेळी सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे उपस्थितांसमोर वर्ष २०२४-२५ चा कार्यवृत्तांत मांडतील. त्यावर पुढे विवेचनात्मक चर्चा करता येईल. त्याचबरोबर संघप्रेरीत संघटनांचे इतर मुख्य पदाधिकारी प्रांत स्तरावर झालेल्या कार्यांचे निवेदन मांडतील.

संघ शताब्दी संदर्भात सांगताना सुनील आंबेकर म्हणाले की, विजयादशमी २०२५ ला संघाला १०० वर्ष पूर्ण असून '२०२५ ते २०२६' हे वर्ष संघाचे शताब्दी वर्ष म्हणून मानले जाईल. या काळात होणाऱ्या विविध कार्यक्रम, उपक्रमांबाबत बैठकीत चर्चा होईल. त्याचप्रमाणे शताब्दीवर्षात समाजातील लोकांपर्यंत संघ विचार व कार्य पोहोचवण्याबाबत विचारमंथन केले जाईल. संघ स्वयंसेवकांनी हाती घेतलेल्या कार्यात समाजाचा सहभाग कसा वाढवता येईल, याबाबत आवाहनही शताब्दी वर्षात केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत एकूण दोन प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. बांगलादेशातील सध्याचा घटनाक्रम आणि त्याला धरून संघाची पुढील भूमिका काय असेल यावर चर्चा केली जाईल. तसेच संघाची शंभर वर्षाची वाटचाल आणि येणाऱ्या काळात संघाचा विचार काय व आगामी योजना काय असतील यावरही बैठकीत चर्चा होईल.

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सर्व सहा सहसरकार्यवाह तसेच अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्यांसह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ३२ संघप्रेरीत संघटनांचे मुख्य पदाधिकारी उपस्थित असतील. दि. २३ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे माध्यमांना संबोधित करतील.

'औरंगजेब' प्रासंगिक नाही
नागपुरात शिवजयंतीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराबाबत संघाचे मत काय आणि औरंगजेब आज प्रासंगिक आहे का? असे दोन प्रश्न एका महिला पत्रकाराने विचारले. त्यापैकी पहिल्या प्रश्नावर उत्तर देताना सुनील आंबेकर म्हणाले, कोणत्याही प्रकारची हिंसाचार समाजाच्या आरोग्यासाठी चांगला नाही, पोलिसांकडून याबाबत उचित कारवाई सुरुच आहे. ते याविषयी अधिक माहिती शोधतीलच. दुसऱ्या प्रश्नावर उत्तर देत औरंगजेब प्रासंगिक नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...