"छावा चित्रपटात काम करणे मला योग्य वाटले नाही.." अभिनेता भूषण प्रधानने 'या' कारणांमुळे दिला नकार! जरूर वाचा..

    19-Mar-2025
Total Views | 21
 
I didn
 
 
मुंबई : अभिनेता भूषण प्रधानने ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने या भूमिकेच्या अनुभवाविषयी आणि ‘छावा’ चित्रपटातील भूमिकेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
 
 
शेवटच्या दिवशी भावनिक न झाल्याचा अनुभव
महाराजांची भूमिका साकारण्याचा योग येणं हे माझ्यासाठी मोठं भाग्य असल्याचं भूषणने नमूद केलं. “प्रत्येक सेटवर शेवटच्या दिवशी मी भावूक होतो, पण ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या शेवटच्या दिवशी मात्र तसं काहीच झालं नाही. आई-वडिलांचे डोळे पाणावले, पण मी शांत होतो. सुरुवातीला हे समजत नव्हतं, पण नंतर जाणवलं की, महाराज माझ्यात कायम आहेत. त्यांनी दिलेली शिकवण माझ्यासोबत आहे आणि त्यामुळेच मी भावनिक झालो नाही,” असं त्याने सांगितलं.
 
 
‘छावा’मधील भूमिकेसाठी नकार देण्यामागचं कारण
‘जय भवानी जय शिवाजी’ नंतर भूषणकडे अनेक ऐतिहासिक भूमिका आल्या. यामध्ये ‘छावा’ या हिंदी चित्रपटातील एका भूमिकेसाठीही विचारणा झाली होती. मात्र, त्याने ही भूमिका नाकारण्याचा निर्णय घेतला.
 
 
“माझ्यासाठी प्रत्येक भूमिका महत्त्वाची असते, पण केवळ एखादा चित्रपट हिंदी आहे, मोठा आहे, म्हणून त्यात काम करणं मला योग्य वाटलं नाही. मी महाराजांची भूमिका केली आहे, त्यामुळे ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना अधिक जबाबदारीने निर्णय घ्यायला हवा, असं मला वाटलं. म्हणूनच ‘छावा’मधील भूमिकेसाठी मी नकार दिला,” असं भूषणने स्पष्ट केलं.
 
 
भूमिकेबद्दल गांभीर्य आणि शिकलेला धडा
“कोणत्याही गोष्टीला होकार देणं आणि नकार देणं हे आयुष्यात महत्त्वाचं असतं. मला मिळालेल्या भूमिकेचा मी पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न केला. इतिहास समजून घेताना, महाराजांचा अभ्यास करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्या निर्णयांमागेही त्याच शिकवणींचा प्रभाव आहे,” असं तो म्हणाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी भूमिका साकारण्याची संधी मिळणं ही भाग्याची गोष्ट असते. परंतु त्या संधीला न्याय देणं आणि त्यानंतर पुढील निर्णय काळजीपूर्वक घेणं हे तितकंच महत्त्वाचं असतं, हे भूषण प्रधानच्या या भूमिकेवरील वक्तव्यांमधून स्पष्ट होतं.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...