निवडणूक आयुक्त निवडीवर १६ एप्रिल रोजी सुनावणी

    19-Mar-2025
Total Views | 6

Hearing on Election Commissioner selection on April 16
 
नवी दिल्ली:  ( Hearing on Election Commissioner selection on April 16 ) मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय १६ एप्रिल रोजी सुनावणी करणार आहे.
  
२०२३ च्या कायद्यांतर्गत निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला आव्हान देणारी ही याचिका आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी आवाहन केले की, हे प्रकरण लोकशाहीसाठी महत्त्वाचे असल्याने या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी. यावर, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी १६ एप्रिल अशी निश्चित केली. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, आज अनेक महत्त्वाच्या बाबींवर सुनावणी होणार आहे, त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी १६ एप्रिल रोजी होईल.
  
केंद्र सरकारने २०२३ मध्ये निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती, सेवाशर्ती आणि कार्यकाळ कायदा लागू केला होता. या कायद्यांतर्गत, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नियुक्त केलेल्या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय समितीद्वारे केली जाईल.
 
पूर्वी या समितीमध्ये केंद्रीय मंत्र्यांऐवजी सरन्यायाधीशांचा समावेश असायचा, परंतु नवीन कायद्यात सरन्यायाधीशांना या समितीतून काढून टाकण्यात आले आहे. यालाच विरोधक विरोध करत आहेत. कायद्यानुसार, एक शोध समिती पाच नावे निवडेल, ज्यापैकी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समिती एक नाव अंतिम करेल. या कायद्यात अशीही तरतूद आहे की समिती निवडलेल्या नावांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पात्र उमेदवाराची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करू शकते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...

आंतरराष्ट्रीय इन्फ्लूएन्सरचा सर्पमित्राच्या मदतीने सापांसोबत बेकायदा खेळ; वनमंत्र्यांच्या नवी मुंबईतील घटना

आंतरराष्ट्रीय इन्फ्लूएन्सरचा सर्पमित्राच्या मदतीने सापांसोबत बेकायदा खेळ; वनमंत्र्यांच्या नवी मुंबईतील घटना

भारतात आलेल्या आंतरराष्ट्रीय सोशल मिडिया इन्फ्लूएन्सरने मुंबईतील काही बोगस सर्पमित्रांच्या मदतीने सापांसोबत बेकायदा खेळ केल्याची घटना समोर आली आहे (handling protected snake). नवी मुंबईतील घणसोली येथे बोगस सर्पमित्रांनी या आंतरराष्ट्रीय इन्फ्लूएन्सरना साप हाताळण्यासाठी देऊन त्याचे व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारित केले (handling protected snake). यासंदर्भात ठाणे वन विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून वन विभागाकडून चौकशी सुरू आहे (handling protected snake). महत्त्वाचे म्हणजे सर्पमित्रांनी आंतरराष्ट्रीय इन्फ्ल..

केवळ दंगलखोरांना अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी धुडकावला, हिंदू संघटनांच्या  आठ कार्यकर्त्यांना अटक

केवळ दंगलखोरांना अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी धुडकावला, हिंदू संघटनांच्या आठ कार्यकर्त्यांना अटक

नागपूर दंगलीचे पडसाद आता देशात उमटू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरात असलेल्या मुघलशासक औरंगजेबाच्या कबरीवरून हिंसाचार झाल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पोलिसांनी फहीम खानसोबत इतर ५१ जणांना अटक करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. कुराणचे पान जाळल्याच्या एका अफवेमुळे निष्पाप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दंगलखोर कट्टरपंथींना आपल्याच लोकांना अटक करण्यात आली असे वाटत आहे. मात्र, पोलिसांनी कोणतीही तडजोड न करता आता हिंदूंना ..