इतिहासाच्या पाऊलखुणा असलेल्या माँ जिजाऊंच्या पाचाड येथील समाधीस्थळाचा दर्जेदार विकास करा

भाजपा गटनेते आ.प्रविण दरेकर यांची मागणी

    19-Mar-2025
Total Views | 7
 
 Develop the historical footprints of Maa Jijau at Pachad Pravin Darekar
 
मुंबई : ( Develop the historical footprints of Maa Jijau at Pachad Pravin Darekar ) राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ दर्जेदार पध्दतीने विकसित केले पाहिजे. तेथे दर्जेदार अशा कुठल्याही मूलभूत सुविधा नाहीत. समाधी स्थळ हे ऐतिहासिक पाऊलखुणा आहे, त्या टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. यासाठी रायगड प्राधिकरणाच्या कामाचा आढावा घेऊन शासनाने मूल्यमापन करावे, अशी विनंती भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात केली.
 
विधान परिषदेत आज आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पाचाड येथील जिजाऊंच्या समाधीस्थळाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत भाग घेताना आ.दरेकर म्हणाले की, राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ विकसित केले पाहिजे. दर्जेदार अशा कुठल्याही मूलभूत सुविधा तेथे नाहीत. प्राधिकरणाला ६००-६५० कोटी निधी सरकारने दिला आहे. प्राधिकरणाचा निधी नातेखिंडीपासून काँक्रिटचा रस्ता करण्याइतपत सीमित नाही. समाधीस्थळ ऐतिहासिक पाऊलखुणा आहेत, त्या टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. प्राधिकरणाने केलेली कामे, निधीचा वापर, कामाचे प्राधान्य या बाबींचा सरकारने एकदा आढावा घ्यावा, आवश्यकता वाटली तर निधी वाढवून द्यावा आणि पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांच्याशी बोलून पर्यटनाचा निधीही यासाठी उपलब्ध करावा. प्राधिकरणाचा किती निधी कधी उपलब्ध करून देणार, पर्यटन विभागाकडून याकरिता वाढीव निधी देणार का ? प्राधिकरणाच्या कामाचा आढावा घेऊन मूल्यमापन करणार का ? असे प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केले.
 
या प्रश्नाला उत्तर देताना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार म्हणाले की, रायगड प्राधिकरणाला निधी वळता केला आहे. यंदाच्या बजेटमध्ये निधी आणखी वाढवून देत आहोत. पर्यटनाचा निधी तिकडे हवाय, अशी परिस्थिती नाही. २०१७ पासून टप्प्याटप्प्याने कामांना सुरुवात झाली आहे. सन्माननीय सदस्य प्रविण दरेकर यांनी सांगितल्याप्रमाणे कामांच्या पाठपुराव्याची, मूल्यमापनाची गरज आहे. तशी आढावा बैठक सन्माननीय सदस्यांसह लवकरच घेऊ, असे आश्वासनही मंत्री शेलार यांनी दिले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...