अयोध्येत 'अशी' साजरी होणार यंदाची रामनवमी

मंदिर ट्रस्टकडून रुपरेषा जाहीर

    18-Mar-2025   
Total Views | 7

Ramnavami in Ayodhya 2025

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ramnavami in Ayodhya)
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने दि. ६ एप्रिल रोजी येणाऱ्या रामनवमीबाबत मोठी घोषणा केली आहे. प्रभू श्रीरामांची जयंती रामजन्मभूमीवर मोठ्या थाटामाटात साजरी केली जाणार असल्याचे मंदिर ट्रस्टने सांगितले. सोमवारी यासंदर्भात कार्यक्रमाची रूपरेषा प्रसिद्ध करण्यात आली.

हे वाचलंत का? : नागपूरातील हिंसाचारानंतर विहिंपची मोठी भूमिका!

मिळालेल्या माहितीनुसार, यादिवशी धार्मिक विधी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू होतील. सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत रामललाचा अभिषेक होईल. त्यानंतर सकाळी १०.३० ते १०.४० (दहा मिनिटे) ते साडेदहा या वेळेत दहा मिनिटे पडदा झाकला जाईल. १०.४० वाजल्यापासून प्रभू रामलालांचा शृंगार सुरू होईल.

अशी माहिती आहे की, शृंगार दरम्यान दर्शन सतत सुरू राहणार आहे. याचवेळी रामललास नैवेद्य दाखवला जाईल. दुपारी ठीक १२ वाजता रामललांची आरती व सूर्य टिळकाने रामललांचा मस्तकाभिषेक होईल. भक्तांना घरबसल्या दूरचित्रवाणीवरील संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. दरम्यान मंदिरात वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानस यांचे पठण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..