नागपूरात तुफान राडा! दोन गटात दगडफेक; नेमकं काय घडलं?

    18-Mar-2025
Total Views | 10
 
Nagpur Mahal
 
नागपूर : नागपूरमधील महाल परिसरात सोमवार, १७ मार्च रोजी रात्री औरंगजेबाच्या कबरीवरून तुफान राडा झाला. यादरम्यान, दोन गटात दगडफेक झाली असून मोठ्या प्रमाणात जाळपोळही करण्यात आली. यावेळी जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली.
 
राज्यभरात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला असून ती कबर हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. याच मुद्यावरून नागपूरात सोमवारी रात्री हिंसाचार उसळला. काही अफवा पसरल्यामुळे नागपूरमध्ये तणाव निर्माण झाला आणि दोन गटांनी एकमेकांना हाणामारी करत रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. दरम्यान, जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली असून जवळपास ३४ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत.
 
दरम्यान, पोलिसांनी ५० पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतले असून विविध भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी लागू असेल. यासोबतच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता महाल परिसरातील शाळांनाही सुटी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांततेचे आवाहन केले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..