नागपूर हिंसाचार हा सुनियोजित कट? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली शंका

    18-Mar-2025   
Total Views | 15
 
Eknath Shinde Nagpur violence
 
मुंबई : नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या हिंसाचार हा सुनियोजित कट असल्याचा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत व्यक्त केला. औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून त्याचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण का सुरु आहे? कुणी सुरु केले? कशासाठी सुरु केले? याच्या मुळाशी तर सरकार जाईल. ज्या औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा छळ करून हत्या केली. छावा सिनेमात त्यांची खरी वस्तुस्थिती दाखवण्यात आली आहे. औरंगजेबाने ४० दिवस छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला. अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे योग्य आहे का? औरंग्याचे उदात्तीकरण करणे म्हणजे शंभूराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे आहे. हा देशद्रोह आहे. औरंग्या आपल्या महाराष्ट्राचा घास घेण्यासाठी आला. आपली मंदिरे उध्वस्त केली. रक्ताचे पाट वाहिले. हा सगळा इतिहास असताना औरंगजेबाचे समर्थन करणे योग्य नाही. आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. एक सच्चा देशभक्त मुसमानसुद्धा औरंग्याचे समर्थन करणार नाही असे त्याचे क्रौर्य होते. औरंग्याने शंभूराजांचा छळ करून त्यांना मारले तरीसुद्धा त्यांनी त्याच्यासमोर मान झुकवली नाही. हा इतिहास आहे."
 
हे वाचलंत का? -  जमावाकडून दगडफेक ते पोलिस उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला! नागपूर घटनेबाबत मुख्यमंत्र्यांचे सभागृहात निवेदन; हिंसाचाराचा संपूर्ण घटनाक्रम केला उघड
 
"काल नागपूरमध्ये औरंगजेबाच्या विरोधात आंदोलन केले. असे कितीतरी आंदोलन होत आहेत. औरंगजेब आपला संत, सगासोयरा किंवा नातेवाईक होता का? कोण आहे हा औरंग्या? औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. नागपूरमध्ये आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब मध्यस्ती केली आणि दोन्ही समाजांमध्ये शांतता प्रस्थापित केली. परंतू. बरोबर संध्याकाळी ८ वाजता पाच हजार लोकांना जमाव कसा काय जमतो? महाल परिसर, मोमीनपुरा, हंसापूरी यासह इतर भागात लोक जमले. घरांमध्ये मोठमोठे दगड टाकले, हॉस्पीटलची तोडफोड केली, तिथल्या देवांचे फोटो जाळू टाकले. एक पाच वर्षांचा बच्चू मरता मरता वाचला. हे सगळे काय सुरु आहे?" असा सवाल त्यांनी केला.
 
विशिष्ट समुदायाला टार्गेट केले!
 
"लोकशाही मार्गाने तुम्ही आंदोलन करा. पण तुम्ही कायदा हातात घेऊन लोकांवर अन्याय करणार का? एका विशिष्ट समुदायाला टार्गेट केले गेले. या हल्ल्यात तीन उपायुक्त अधिकारी जखमी होतात. दगडफेक, कुऱ्हाडीने हल्ले होतात. पेट्रोल बॉम्ब फेकले जातात, गाड्या जाळल्या जातात. एका विशिष्ट ठिकाणी दररोज १०० ते १५० गाड्या पार्क करण्यात येतात. पण काल तिथे एकही गाडी पार्क करण्यात आली नव्हती. याचा अर्थ जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक विशिष्ट समुदायाच्या लोकांना टार्गेट करण्याची ही साजीश होती," असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
अग्रलेख
जरुर वाचा
हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि पतंजली विद्यापीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ वी अखिल भारतीय शास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ ते २१ मार्च दरम्यान हरिद्वार येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. संस्कृत ही आपली मूळ भाषा आहे, जी सत्यतेवर आधारित आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमा..

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्राममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्राममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

Saurav Murder उत्तर प्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि त्यावरील असणारे लोखंडी झाकण सिमेंटचा लेप देऊन बंद करण्यात आले. कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून, पत्नी तिच्या पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना सतत मेसेज आणि कॉल करत. या संबंधीत घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी जाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनास..