बीडमधील २६ पोलिस कराडच्या मर्जीतले! पुरावे सादर करणार; तृप्ती देसाईंचा आरोप काय?

    15-Mar-2025
Total Views |
 
Walmik Karad Trupti Desai
 
पुणे : बीडमधील २६ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भातील पुरावे सादर करण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तृप्ती देसाई यांनी याबाबतची माहिती दिली.
 
त्या म्हणाल्या की, "बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराडच्या मर्जीतील २६ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी २७ जानेवारी रोजी मी जाहीर केली होती. तसेच गृहमंत्रालय आणि बीडच्या पोलिस अधिक्षकांनाही यासंदर्भात तक्रार केली होती. पोलिसांनी याची दखल घेऊन पुरावे सादर करण्यासाठी मला नोटीस जारी केली आहे. या नोटीसचे उत्तर देण्यासाठी सगळे पुरावे घेऊन सोमवार, १७ मार्च रोजी बीड पोलिस अधिक्षक कार्यालयात जाणार आहे."
 
हे वाचलंत का? -  नाना पटोलेंची शिंदे-दादांना ऑफर! वडेट्टीवारांनी टोचले कान, म्हणाले, "त्यांनी असं करण्याची फार..."
 
"वाल्मिक कराडशी संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दलचे सगळे पुरावे सादर करणार आहे. या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली होणे गरजेचे आहे. तसेच चुकीचे काम करणाऱ्यांचे निलंबन होणे आवश्यक आहे," असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
 
वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. याप्रकरणाचा तपास सुरु असून रोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. दरम्यान, बीडमधील अनेक पोलिस वाल्मिक कराडशी संबंधित असल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता. आता त्यांनी पुरावे सादर केल्यानंतर या पोलिसांवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३

मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित!

ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर, हिट मराठी कॉमेडी फ्रँचायझी तिसऱ्या भागासह परतली आहे.ये रे ये रे पैसा ३ अखेर येत आहे. यावेळी, निर्माते आणखी गोंधळ आणि मनोरंजनाचे आश्वासन देत आहेत. संजय जाधव हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर त्यांनी आणि अरविंद जगताप यांनी एकत्रितपणे पटकथा लिहिली आहे. तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, वनिता खरात, नागेश भोंसले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्स ..

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'या' नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत!

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ..