खून से त्यौहार मनाने वाले रंगों के त्यौहार से डर रहे है?
15-Mar-2025
Total Views | 12
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Holi and Namaz in Sambhal)होळीच्या निमित्ताने उत्तर प्रदेश आणि बिहारचे वातावरण यंदा चांगलेच ढवळून निघाले होते. कारण यावर्षी होळी नेमकी शुक्रवारी आली होती. शुक्रवार म्हणजे जुम्म्याचा नमाजही असतो. त्यामुळे काही ठिकाणी वाद सुरु झाल्याचे दिसून येत होते. खरं तर, हा वाद नव्हताच. मात्र, या देशात हिंदू सोडून बाकी सर्व धर्मीयांच्या धार्मिक भावना सांभाळण्याचा एक रिवाज होता. त्यातून लाडवलेल्यांचा एक गट तयार झाला आणि या गटाला काहीही झाले, की ‘इस्लाम खतरे मे’ असं वाटायला लागतं. मात्र होळी आणि विशेषतः धुलिवंदनाच्या दिवशी उत्तर प्रदेशात खासकरून संभलमध्ये जे चित्र दिसलं, ते खरंच कौतुकास्पद होतं. धुलिवंदनही उत्साहात पार पडलं आणि नमाजही शांततेत झाला. लोकांच्या परस्पर समजुतीमुळेच हे शक्य झालं यात शंका नाही.
‘शुक्रवारी आपल्या अंगावर रंग पडला, तर आपण नमाज पढण्यास पवित्र राहणार नाही,’ असा एक विचित्र दावा, उत्तर भारतातल्या मुसलमानांनी केला होता. खरं तर, आजच्या बदललेल्या उत्तर प्रदेशात असल्या आचरट तर्कांना आता वाव नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, आपण मुसलमानांना ‘प्रेमाने समजावल्या’चा दावा केला होता. भारतभरातल्या सर्वच धर्मांध मुस्लिमांना ‘योगी स्टाईल’ने प्रेमाने समजावण्याची वास्तविक गरज आहे. वरवर पाहता हा संघर्ष आजचा वाटत असला, तरी तो जुनाच आहे. हिंदूंच्या शोभायात्रा, गणेश चतुर्थी, रामनवमी अशा मिरवणुका ही धर्मांध मुस्लिमांना दंगे करण्याची, हिंदूंची घरे-दारे व दुकाने लुटण्याची संधी वाटते. सणावारांना फटाके वाजवायचे नाहीत, वाद्ये वाजवायची नाहीत, असे हे विचित्र तर्कट आहेत.
आपल्या देशातल्या तथाकथित पुरोगाम्यांना तर हे असले तर्कट मान्य करणे म्हणजे सर्वधर्म समभाव वाटतो. जसजसे आपण याच्या तपशिलात जायला लागतो, तसतसे खरे चित्र बरोबर उलट असल्याचे आपल्या लक्षात येते. हिंदूंच्या सणावाराला कंदील, फटाके, फुगे, रंग, पणत्या, रांगोळी, पतंग, मांजे, वाद्ये या सगळ्यांचे विक्रेते म्हणून सर्वसामान्य मुस्लीम उभे राहणार, मात्र हिंदूविरोधी कारवाया करणारे धर्मांध मुसलमान आपल्या कारवायांना अंजाम देत असताना हे सगळे चिडीचूप राहणार, असे यापुढे या देशात चालणार नाही. इकबाल शेख फसवून तिसरे लग्न करून रुपाली चंदनशिवेचा निर्घृण खून करतो, मुंबई व देशात वातावरण बिघडते, मात्र सुशिक्षित व तथाकथित पुरोगामी व मुस्लीम समुदायाकडूनही धिक्काराचा एक साधा सूरही उमटत नाही.
मुलांच्या परीक्षा असो, कुणाच्या घरी सुतक असो, मशिदीवरचा भोंगा मात्र वाजणारच. त्यांना कुणीही रोखायचे नाही. कुणी थांबवायला गेले, तर वस्त्यांमधल्या पुरुषांसकट महिलाही हिंसक होऊन अंगावर येतात. मानखुर्दमधल्या करिश्मा भोसले या विज्ञानाच्या विद्यार्थिनीचाही असाच अनुभव होता. मात्र, यावेळीसुद्धा वर उल्लेखलेली सगळी मंडळी चिडीचूप होती. हिंदूंच्या सणाप्रमाणे मुस्लिमांचेही अनेक सण साजरे होतात. यातले बहुसंख्य सण हे हिंसकच असतात. हिंसक याअर्थी की, बकरी ईदला होणारा रक्तपात हा असाच हिंसक विषय. गृहनिर्माण संकुलांमध्ये बकरे आणून ठेवण्यापासून ते बासी ईदनंतर खूर, कान, शिंगे सोसायट्यांमध्ये सापडण्यापर्यंत सगळे प्रकार चालतात. केंद्रात मोदींचे सरकार आल्यानंतर गोवंश काही प्रमाणात बचावला; मात्र चोरट्या पद्धतीने त्याची हत्या होतच असते. वस्तुतः गोवंशांच्या बळीला इस्लाममध्येसुद्धा कोणताही आधार नाही. मात्र, तरीसुद्धा हे प्रकार चालूच असतात.
२०१४ साली जे मूलभूत राजकीय परिवर्तन झाले, त्यामुळे हिंदूंच्या या देशाचे घटनादत्त नागरिक म्हणून अशा पल्लवित झाल्या आहेत. महाराष्ट्रातही हिंदूंच्या न्याय्य हक्काची पायमल्ली होऊ न देणारे सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आले आहे. होळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या दोन घटना हिंदूंच्या दृष्टीने आशादायक आहेत. मशिदीवरचे भोंगे उतरवण्याची भाषा अनेकांनी केली, ते आजवर उतरवता मात्र कुणालाही आलेले नाहीत. या विषयात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून, आता स्वतः उतरले आहेत. दिवसभर काम करून रात्री विश्रांतीसाठी पाठ टेकवणारे कष्टकरी, पहाटे उठून कामाला लागणारे चाकरमानी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांनाच या भोंग्याचा त्रास आहे. भोंग्यांना सरसकट परवानगी न देण्याचे व तक्रार आल्यास भोंगे जप्त करण्याची भूमिका त्यांनी विधिमंडळासमोर स्पष्ट केली आहे. विधिमंडळासमोर बसून रमजानचे रोजे सोडणार्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या बातमीमुळे, मुंबईत पहिल्यांदाच हटकले गेले. शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मजारी बांधण्यापासून ते थेट विधिमंडळासमोरच्या पदपथावर रोजे इफ्तारी करण्यापर्यंत, मुस्लिमांमधील एका वर्गाला मोठा रस असतो. हे काय कोडे आहे, ते एकदा उकलून पाहिले पाहिजे आणि त्याला पायबंदही बसवला पाहिजे. होळीच्या निमित्ताने ही जी धुळवड सुरू आहे, त्यात थोडाफार रंग अशा लोकांवर पडला आणि ते रंगले, तर त्यांचे भलेच होईल. हिंदूंनी उगीच अपराधीपणाचा भाव बाळगण्याचे कारण नाही.
उत्तर प्रदेशात संभलमध्ये होळी आणि शुक्रवारची नमाज या दोन्ही गोष्टी शांततेत पार पडल्या. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर गेले काही दिवस संभलमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संभळ शहरात पारंपारिक चौपई मिरवणूकही काढण्यात आली. एकूण १२१२ ठिकाणी होलिका दहन आणि ६० हून अधिक मिरवणुका निघाल्याची माहिती आहे.
संभळमधील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दंगल झाली होती. यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संभळमध्ये कडक बंदोबस्त ठेवला होता. ड्रोनच्या माध्यमातूनही पाळत ठेवण्यात आली होती. संपूर्ण शहराची २९ सेक्टरमध्ये विभागणी करण्यात असून त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या दंगलीनंतरचा हा पहिलाच मोठा उत्सव होता, जो शांततेत पार पडला. त्यामुळे भविष्यातही असेच सर्व सण शांततेत साजरे होतील, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे. प्रशासनाची सक्रियता आणि लोकांच्या परस्पर समजुतीमुळेच हे शक्य झाले आहे.