रामनवमीवरून सुवेंदू अधिकारींची मोठी घोषणा; ममतांविरोधातही साधला निशाणा

    14-Mar-2025
Total Views | 12

Suvendu Adhikari on Ramnavami

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Suvendu Adhikari on Ramnavami)
रामनवमीच्या मुहूर्तावर सुमारे दोन हजार रॅलीमध्ये एक कोटी हिंदू सहभागी होतील, अशी मोठी घोषणा पश्चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी शुक्रवारी केली. इतकेच नव्हे तर ममता सरकारविरोधात निशाणा साधत रॅली काढणाऱ्यांनी प्रशासनाची परवानगी घेऊ नये, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

हे वाचलंत का? : युनूसना हुकूमशहा म्हणत बांगलादेशी राजदूतने दिला घरचा आहेर

ते म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये ६ एप्रिल रोजी रामनवमीच्या सुमारे २००० रॅलींमध्ये एक कोटींहून अधिक हिंदू सहभागी होतील. पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम मतदारसंघातील एका कार्यक्रमात बोलताना, अधिकारी यांनी रामनवमी आयोजकांना "आम्हाला प्रभू रामाची प्रार्थना करण्यासाठी परवानगीची गरज नाही" म्हणून रॅली काढण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेऊ नये असे आवाहन केले. रॅली दरम्यान प्रत्येकजण शांततेत राहील याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे अधिकारी म्हणाले.

गेल्या वर्षी, सुमारे ५० हजार हिंदूंनी सुमारे एक हजार रॅलींमध्ये सहभाग घेतला होता. यावर्षी, ६ एप्रिल रोजी १ कोटीहून कमी हिंदू दोन हजार रॅली काढण्यासाठी राज्यभर रस्त्यावर उतरतील, अशी माहिती आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि पतंजली विद्यापीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ वी अखिल भारतीय शास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ ते २१ मार्च दरम्यान हरिद्वार येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. संस्कृत ही आपली मूळ भाषा आहे, जी सत्यतेवर आधारित आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमा..

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्राममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्राममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

Saurav Murder उत्तर प्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि त्यावरील असणारे लोखंडी झाकण सिमेंटचा लेप देऊन बंद करण्यात आले. कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून, पत्नी तिच्या पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना सतत मेसेज आणि कॉल करत. या संबंधीत घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी जाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनास..