कल्याणमधील बाल शाखेवर धर्मांधांची दगडफेक

तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दोघांचा तपास सुरु

    10-Mar-2025
Total Views | 20

Stone Pelting on RSS Shakha Dombivli

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS Shakha Kalyan)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्यवीर नगर, कल्याण पूर्व येथील कचोरे गावच्या बाल शाखेवर दगडफेक झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. सीसीटिव्ही फुटेजनुसार सर्व पाच आरोपी इस्लामिक विचारसरणीचे असल्याचे स्पष्ट होत आहे. पाच पैकी तीन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. झालेल्या दगडफेकीत बाल स्वयंसेवकांना कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नसून सदर प्रकरणी सर्व आरोपींविरोधात टिळक नगर पोलीस स्थानक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तिघांना ताब्यात घेतले असून दोघांचा तपास सुरु आहे.

मिळालेल्या एफआयआर कॉपीनुसार, चौधरीवाड्यातील मोकळ्या मैदानात लागणाऱ्या या शाखेत दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत परिसरातील ८ ते १५ वयोगटातील लहान मुलांना मैदानी खेळ, राष्ट्रभक्ती, बाल संस्कारचे धडे दिले जातात. रविवार, दि. ९ मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास बीएसयुपी बिल्डींग न्यु गोविंदवाडी इमारतीच्या आडून काही धर्मांधांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सिमेंट काँक्रिटचे दगड फेकण्यास सुरुवात केली. सदर प्रकरणाची टिळक नगर पोलिसांनी दखल घेतली असून आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम १२५ व कलम २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना नाना पटोले यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना नाना पटोले यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

Nana Patole उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर खुर्च्यांच्या अदलाबदलीवरून चर्चाही झाल्या. त्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, असे नाना पटोले म्हणाले. यामुळे आता राज्याच्या राजकीय परिस्थितीत उलथापालथ ..

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..