रिलायन्स फाऊंडेशनकडून कुंभमेळ्यासाठी ‘तीर्थ यात्री सेवा’

खानपान, वैद्यकीय सेवेसह, यात्रेकरुंच्या सुरक्षेची घेणार काळजी

    03-Feb-2025
Total Views | 38



reliance


मुंबई : उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे सुरु असलेला कुंभमेळा आतापर्यंतचा सर्वाधिक गर्दीचा मेळा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर रिलायन्स कंपनीने कुंभमेळ्यातील भक्तगणांसाठी तीर्थ यात्री सेवासुरु केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने रिलायन्स फाऊंडेशनच्या यांच्या सहयोगातून ही सेवा सुरु केली आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या वुई केअर या ब्रीदास साजेशी अशीच ही योजना आहे. या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी या तीर्थ यात्री सेवेचा मोठा लाभ होणार आहे.

 

रिलायन्स फाऊंडेशनच्या संचालिका नीता अंबानी यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, जेव्हा आपण तीर्थयांत्रींची सेवा करु शकतो तेव्हा आपल्यालापण त्याचे पुण्य मिळते. आमची सेवा ही यात्रेकरुंच्या सेवेसाठी तत्पर आहे. अशा हजार वर्षातून एकदा होणाऱ्या या महापर्वणीनिमित्त यात्रेकरुंच्या सेवेसाठी सादर आहे. आम्ही वुई केअर या तत्वज्ञानावर विश्वास ठेवतो. त्यामुळे महाकुंभात येणाऱ्या यात्रेकरुंसाठी वैद्यकीय मदत, खानपानाची सुविधा या सर्व सोयींच्या माध्यमातून लोकांची सेवा आम्ही करत आहोत.

 

या सेवेचा भाग म्हणून रिलायन्स फाऊंडेशन तर्फे यात्रेकरुंना मोफत गरम जेवण, शुध्द पाण्याची सुविधा, यात्रेकरुंना मदत करण्यासाठी हजारो स्वयंसेवक अशी सर्व सोय पुरवली जात आहे. याच बरोबर यात्रेकरुंना २४ तास वैद्यकीय मदत, डेंटिस्ट सारख्या सुविधा, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन्स पुरवण्याची सुविधा यासर्व गोष्टी पुरवल्या जाणार आहेत. तसेच वृध्द आणि दिव्यांग यात्रेकरुंसाठी व्हीलचेअर्स, येण्याजाण्याची सुविधा यासर्व गोष्टी पुरवल्या जाणार आहेत.

 

रिलायन्स फाऊंडेशनने यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनासोबत सहकार्य करत यात्रेकरुंसाठी पोलिस सुविधा, स्नानासाठी नदीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वयंसेवकांची सुविधा, स्नानासाठी जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी पाणपोलिस तसेच,बोटींची सुविधा यासर्वसुविधा देण्यात येणार आहेत.


 
 
 

अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...