संरक्षण क्षेत्रासाठी ६ लाख ८१ हजार २१० कोटी रुपयांची तरतूद

    01-Feb-2025
Total Views | 21

DEFENCE 
 
नवी दिल्ली : (Defence Budget 2025) यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण मंत्रालयासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ६,८१,२१०.२७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा ९.५३ टक्के जास्त आहे आणि केंद्रीय अर्थसंकल्पाच्या १३.४५ टक्के इतकी आहे, जी इतर मंत्रालयांमध्ये सर्वाधिक आहे.
 
यापैकी १,८०,००० कोटी रुपये म्हणजेच एकूण वाटपाच्या २६.४३ टक्के रक्कम संरक्षण सेवांवरील भांडवली खर्चावर खर्च केली जाईल. महसूल शीर्षकावर, सशस्त्र दलांसाठी वाटप ३,११,७३२.३० कोटी रुपये आहे जे एकूण वाटपाच्या ४५.७६ टक्के आहे. संरक्षण पेन्शनमध्ये १,६०,७९५ कोटी रुपये म्हणजेच २३.६० टक्के आणि उर्वरित २८,६८२.९७ कोटी रुपये म्हणजेच ४.२१ टक्के रक्कम संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नागरी संस्थांसाठी आहे.
 
सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत जिथे जग आधुनिक युद्धाच्या बदलत्या प्रतिमानाचे साक्षीदार आहे, भारतीय सशस्त्र दलांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करणे आणि त्यांना तंत्रज्ञानाने प्रगत लढाऊ सज्ज दलात रूपांतरित करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन, संरक्षण दलांच्या भांडवली खर्चावर १,८०,००० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. यापैकी १,४८,७२२.८० कोटी रुपये भांडवली संपादनावर खर्च करण्याचे नियोजन आहे, ज्याला सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण बजेट म्हटले जाते आणि उर्वरित ३१,२७७.२० कोटी रुपये संशोधन आणि विकास आणि देशभरातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीवरील भांडवली खर्चासाठी आहेत.
 
डीआरडीओसाठी भरीव तरतूद
 
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओस २६,८१६.८२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ही रक्कम गत वर्षापेक्षा १२.४१ टक्क्यांहून जास्त आहे. यापैकी १४,९२३.८२ कोटी रुपयांचा मोठा वाटा भांडवली खर्चासाठी आणि संशोधन आणि विकास प्रकल्पांना निधी देण्यासाठी देण्यात आला आहे. यामुळे मूलभूत संशोधनावर विशेष लक्ष केंद्रित करून आणि विकास-सह-उत्पादन भागीदाराद्वारे खाजगी भागधारकांना मदत करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात डीआरडीओ आर्थिकदृष्ट्या बळकट होईल.
 
सीमारेषेवर पायाभूत सुविधा मजबूत करणे
 
सीमेवरील पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी आणि कठीण परिस्थितीतून सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांची हालचाल सुलभ करण्यासाठी, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनला ७,१४६.५० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत जे २०२४-२५ च्या तरतूदीपेक्षा ९.७४ टक्के जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी बीआरओसाठी केलेली आर्थिक तरतूद अरुणाचल प्रदेशातील एलजीजी – दामतेंग – यांगत्से आणि जम्मू – काश्मीर मधील आशा-चीमा-अनिता आणि राजस्थानमधील बिरधवाल-पुग्गल-बज्जू सारखे बोगदे, पूल आणि रस्ते बांधून सीमावर्ती भागात राष्ट्राच्या धोरणात्मक हिताला चालना देईलच, परंतु सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देईल, रोजगाराच्या संधी प्रदान करेल आणि पर्यटनाला प्रोत्साहन देईल.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...