महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत ९० जण रुग्णालयात दाखल

मृतांचा आकडा आला समोर

    29-Jan-2025
Total Views | 167

 Mahakumbh 2025
 
लखनऊ : प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळाव्यात  (Mahakumbh 2025) मंगळवारी २८ जानेवारी २०२५ रोजी संगम घाटावर भाविकांची अमृत स्नानासाठी प्रचंड गर्दी वाढली होती. त्यावेळी गर्दीमुळे नागा साधू आल्याची अफवा पसरल्याने असंख्य भाविकांनी पळापळ झाली. घटनेदरम्यान अनेकजण गर्दीमध्ये चिरडले गेले. या घटनेला आता काही तास उलटून गेले आहेत. या अपघातात ९० जण भाविक जखमी झाले असून ३० जण भाविक मृत पावल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
मृत ३० पैकी यातून आता २५ जणांची ओळख पटली असल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर ९० जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेत अधिकाऱ्यांच्या मते, गर्दीमुळे बॅरिके़ड्स तोडत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.
उत्तर प्रदेशातील प्रयागरामध्ये २०२५ मध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान संगम घाटानजीक अमृत स्नानासाठी भाविक जमल्याने गर्दी वाढली होती. ही परिस्थिती निर्माण झाल्याने एकप्रकारे महाकुंभमेळा २०२५ ला गालबोट लागले असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.
 
 
 
प्रसारमाध्यमानुसार, रात्री १.३० वाजताच्या सुमारास मोठ्या संख्येने भाविकांनी संगम घाटाच्या दिशेने जात असताना अचानक चेंगराचेंगरी झाली. अशावेळी काही लोक हे गर्दीत सापडल्याने तिथेच घटनास्थळी पडले होते. यामध्ये काहींचा मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर एका रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...