एसटीची बसस्थानके सुंदर व आकर्षक होणार

वास्तुविशारदांनीही सुशोभीकरणासाठी आपले योगदान द्यावे!

    28-Jan-2025
Total Views |

st stop
ठाणे, दि.२८: प्रतिनिधी भविष्यामध्ये एसटीची बसस्थानके बांधताना ते सुंदर आणि सुशोभित असावीत यासाठी महाराष्ट्रातील वास्तुविशारदांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्यांनी एसटीच्या मोकळ्या जागेवर विकसित होत असलेल्या प्रकल्पामध्ये आपल्या सुंदर आणि कल्पक कौशल्यातुन पर्यावरण पूरक आणि शाश्वत विकासाचे "रोल मॉडेल" तयार करावे असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते "इंडियन असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट" यांच्या माध्यमातून ठाणे येथे आयोजित दोन दिवसांच्या संमेलनाचे उद्घाटन करताना बोलत होते. या वेळी राज्यभरात एसटीच्या जमिनीवर विकसित होणाऱ्या प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण मंत्री सरनाईक यांनी केले.

"भविष्यात मोक्याच्या ठिकाणी विखुरलेल्या एसटीच्या सुमारे ३ हजार एकर जमीनीचा विकास करण्यासाठी सर्व समावेश आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यामध्ये वास्तुविशारद म्हणून आपल्या सूचना आणि प्रस्ताव दिल्यास तो आराखडा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला तयार करणे शक्य होईल! भविष्यात एसटीची सर्व बसस्थानके, आगारे ही वास्तुविशारदाच्या सौंदरदृष्टीने विकसित झालेले असतील. एसटीच्या जमीनीवर उभे राहणाऱ्या प्रकल्पामध्ये आपल्या कौशल्यपूर्ण योगदानातून निर्माण झालेल्या वास्तू येणाऱ्या पिढीला प्रेरक ठरतील अशी अपेक्षा व्यक्त करतो " असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. यावेळी आमदार संजय केळकर व जितेंद्र आव्हाड यांनी देखील मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास अवचट महाराष्ट्र आर्किटेक असोसिएशनचे पदाधिकारी विविध आर्किटेक्ट महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना नाना पटोले यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना नाना पटोले यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

Nana Patole उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर खुर्च्यांच्या अदलाबदलीवरून चर्चाही झाल्या. त्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, असे नाना पटोले म्हणाले. यामुळे आता राज्याच्या राजकीय परिस्थितीत उलथापालथ ..

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..