अक्षरलिपी या सभ्यता आणि संस्कृतीच्या वाहक!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : अच्युत पालव लिखित ‘अक्षरभारती’ कॅलिग्राफी पुस्तकाचे प्रकाशन

    28-Jan-2025
Total Views | 45
 
Fadanvis
 
मुंबई : अक्षरलिपी या सभ्यता आणि संस्कृतीच्या वाहक असून भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी लिपी जिवंत ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
मंगळवार, २८ जानेवारी रोजी जहांगीर आर्ट गॅलरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुलेखनकार अच्युत पालव लिखित ‘अक्षरभारती’ या कॅलिग्राफी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नवनीत प्रकाशनाचे संचालक अनिल गाला, पद्मश्री अच्युत पालव उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेकडून कारवाईचा धडाका!
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पद्मश्री अच्युत पालव यांनी अक्षरकलेला जनाजनांत पोहोचवले आणि अनेकांना त्यात सामावून घेतले. अक्षरलिपी या बाबी संस्कृतीच्या वाहक असतात. भारतीय संस्कृती ही इतकी प्राचिन आहे की, त्यात विविध प्रकारच्या लिपी पाहायला मिळतात. या लिपी जिवंत ठेवल्या नाही तर आपला इतिहास आणि आपली समृद्ध संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार नाही. अच्युत पालव यांच्यासारखी मंडळी या लिपी जिवंत ठेवतात आणि आपल्यापर्यंत पोहोचवतात. सुंदर किंवा वळणदार अक्षरांची मोहिनी वेगळी असती. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या विषयात चांगले गुण मिळवायचे असतील तर त्यांचे अक्षर चांगले असणे आवश्यक आहे. अक्षरांच्या माध्यमातून एक मोठा ज्ञानाचा खजिना देखील या आपल्यापर्यंत पोहोचत असतो," असे ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'या' नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत!

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ..

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. याच सहकार क्षेत्राचे जाळे महाराष्ट्रात खूप खोलवर रुजले आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे सहकारी वित्तीय संस्था आणि या वित्तीय संस्थांमधील महत्त्वाचा भाग म्हणजे, सहकारी पतसंस्था म्हणजेच सहकारी पतपेढी. सर्वसामान्य माणसांच्या जवळच्या आणि त्यांच्या अर्थकारणातही या पतसंस्थांना आजही जिव्हाळ्याचे स्थान आहे. पण, आज याच पतसंस्थांची चळवळ ही काही गैरप्रकारांमुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. त्यानिमित्ताने पतसंस्थांच्या अर्थकारणाचा, ..