श्रीलंकेसोबतचा करारनामा रद्द झाल्याची बातमी खोटी! अदानी समूहाचे स्पष्टीकरण

    25-Jan-2025
Total Views | 76

adani 1

नवी दिल्ली : श्रीलंका सरकारसोबत केलेला पवन उर्जा प्रकल्पाचा करार रद्द झाला नसल्याचं स्पष्टीकरण अदानी समूहाने दिले. २४ जानेवारी रोजी एक निवेदन प्रस्तुत करून या बद्दल माध्यमांना माहिती देण्यात आली. काही दिवसांपासून मन्नार आणि पूनेरिन या ठिकाणी उभारले जाणारे प्रकल्प रद्द केले जाणार असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या. परंतु अदानी समूहाने या संदर्भातील स्पष्टीकरण जारी केले आहे.

आपल्या निवेदनात अदानी समूहाने असे म्हटले आहे की श्रीलंका सरकार सोबत झालेला करार रद्द करण्यात आला नसून, या संदर्भातील बातम्या खोट्या आहेत. परंतु या प्रकल्पासाठी जे दरपत्रक मे २०२४ साली जाहीर करण्यात आले होते, त्याचा पुर्नविचार सरकार करीत आहे. या पुर्नविचाराचा अदानी समूहाच्या प्रकल्पावर कुठल्याही प्रकारे परिणाम होणार नाही. श्रीलंकेच्या मंत्रिमंडाळाने २ जानेवारी २०२५ रोजी घेतलेला पुर्नविचाराचा निर्णय हा एकूण प्रक्रियेचा एक भाग आहे. देशाच्या उर्जा धोरणांशी संबंधित प्रकल्प सुसंगत राहावीत यासाठी हे केले जात आहे. श्रीलंकेतील अक्षय उर्जेतील गुंतवणूकीसाठी आणि श्रीलंकेच्या विकासासाठी अदानी समूह कटीबद्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. मे २०२४ साली पूर्वीच्या सरकारने अदानी समूहासोबत अक्षय उर्जेचा करार केला होता. याअंतर्गत ४८४ मेगावॅटच्या पवन ऊर्जा प्रकल्प मन्नार आणि पूनेरिन इथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे हा करारनामा रद्द करण्याच आल्याच्या बातम्या श्रीलंकेच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्या होत्या. यामुळेच अदानी समूहाने अखेर या वादावर पडदा टाकला आहे.

 
अग्रलेख
जरुर वाचा
२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'या' नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत!

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ..

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

सर्वसमावेशक विकासासाठी पतपेढी चळवळ आवश्यकच : विद्याधर अनास्कर

2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. याच सहकार क्षेत्राचे जाळे महाराष्ट्रात खूप खोलवर रुजले आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे सहकारी वित्तीय संस्था आणि या वित्तीय संस्थांमधील महत्त्वाचा भाग म्हणजे, सहकारी पतसंस्था म्हणजेच सहकारी पतपेढी. सर्वसामान्य माणसांच्या जवळच्या आणि त्यांच्या अर्थकारणातही या पतसंस्थांना आजही जिव्हाळ्याचे स्थान आहे. पण, आज याच पतसंस्थांची चळवळ ही काही गैरप्रकारांमुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. त्यानिमित्ताने पतसंस्थांच्या अर्थकारणाचा, ..